
मनपाची मोठी कामगिरी! शहरात ५.२६ लाखांपेक्षा जास्त 'आयुष्मान भारत' कार्डांची निर्मिती
डॉ. उज्वला भामरे यांच्या समन्वयातून आशा सेविका, एमपीडब्ल्यू कर्मचारी तसेच युग इन्फ्राटेक सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्या सहकार्याने पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून ई-केवायसी आणि कार्ड निर्मितीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. शहरातील सर्व आरोग्य केंद्रे, विविध झोन, दिव्यांगांसाठी विशेष मोहीम तसेच शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये आयुष्मान कार्ड नोंदणीचे उपक्रम राबविले जात आहेत. पात्र लाभार्थ्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन ई-केवायसी पूर्ण करून कार्ड मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.