जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस ठाण्यांसह जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकांनी एकाच वेळी रस्त्यावर उतरून ही मोहीम राबविली. हेल्मेट न वापरणे, अतिवेगाने वाहन चालविणे, राँग साईडने प्रवास करणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे आणि स्टंटबाजी अशा नियमभंग करणाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. अपघातांमागील प्रमुख कारणेही हीच असल्याचे पोलिसांच्या नोंदींमधून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते मे २०२६ या कालावधीत झालेल्या १,२४४ अपघातांपैकी ८५२ अपघात दुचाकींशी संबंधित होते, या अपघातांत ५०१ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले. हेल्मेटचा वापर टाळणे आणि वेगमर्यादेकडे दुर्लक्ष करणे ही दुचाकी अपघातांमागील प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
सन २०२५ मध्ये जिल्ह्यात ८४६ अपघातांची नोंद झाली. त्यापैकी ४८१ प्राणघातक अपघातांत ५३८ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ४५५ जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, ३४२ दुचाकी अपघातांतच ३५७जणांनी प्राण गमावले. त्यामुळे दुचाकी सुरक्षेवा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जानेवारी ते मे २०२६ या पाच महिन्यांत ३९८ अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातांमध्ये २२९ जणांचा मृत्यू झाला असून १२१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील २४० दुचाकी अपघातांत १४४ जणांचा बळी गेला. तर इतर वाहनांच्या १५८ अपघातांमध्ये ८५ जणांचा मृत्यू झाला आहे.
प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्…






