अवैध वाळू उपशाविरोधात बोरगाव कासारीचे ग्रामस्थ आक्रमक
विशेष म्हणजे, रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर व हायवा वाहनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक सुरू असल्याने गावात धुळीचे प्रचंड प्रदूषण निर्माण झाले आहे. ही धूळ घरांमध्ये साचत आहे व
यामुळे श्वसनाचे त्रास तसेच रात्रभर सुरू असलेल्या वाहनांच्या कर्कश आवाजामुळे ग्रामस्थांचे जगणे अवघड झाले आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थ बाबासाहेब मेटे यांनी दिला. या अवैध वाळू उपशाची माहिती महसूल प्रशासनास असून याकडे जाणून-बुजून डोळेझाक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तहसीलदारांनी रात्री मध्यरात्री नदीपात्रात येऊन व्हिडिओ काढत सोशल मीडियावर वायरल करण्यापेक्षा या रस्त्यावर होणारी बेसुमार वाळू वाहतूक रोखावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या आंदोलनात कचरू वाढेकर, राजू गोराडे, संजय गोराडे, कांताबाई जाधव, राधाबाई मेटे, कसाबाई जाधव, बाबासाहेब मेटे, विठ्ठल गोराडे, रुख्मणबाई वाढेकर, नानुबाई वाढेकर, सोनु वाढेकर, नारायण मोठे, गयाबाई मोठे, पांडुरंग मेटे, कडुबा मेटे, पदमाबाई गोराडे, रुख्मणबाई गोराडे, काकासाहेब वाढेकर, गीताबाई वाढेकर, रंजना जाधव आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री १० वाजता संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी सरपंच पती कौतिक जाधव यांनी महसूल व पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप करत, हप्तेखोरीमुळेच हा अवैध वाळू उपसा बिनधास्त सुरू आहे, असा संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली.
बोरगाव कासारी, पिंपळगाव पेठ आणि गणेशवाडी, तांडाबाजार या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळू वाहतुकीच्या वाहनामधून वाळू सांडलेली असल्यामुळे दुचाकी स्वरांचे अपघात होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रस्त्यावर सोडलेल्या वाळूमुळे अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे.






