
Latur Zilla Parishad: झेडपीमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक मुसंडी; विलासराव देशमुखांच्या विचारांवर नव्या पर्वाची सुरुवात
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने दणदणीत यश संपादन करत जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विकासाची परंपरा आणि लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारांवर मतदारांनी शिक्कामोर्तब करत काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. जिल्हाभरातील अनेक गट आणि गणांमध्ये काँग्रेसने आघाडी घेत बहुमताच्या जवळ जाणारी भक्कम कामगिरी केली आहे. निवडणूक निकाल स्पष्ट होताच जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विजयी उमेदवार आणि कार्यकत्यांनी जल्लोष साजरा करत ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत चाभळगावच्या दिशेने कूच केली.
या निवडणुकीत काँग्रेसने संघटनात्मक बळ, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि विकासकामांच्या आधारे मतदारांचा विश्वास जिंकण्यात यश मिळवले. अनेक ठिकाणी काँग्रेस उमेदवारांनी प्रतिस्पध्र्थ्यांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला असल्याचे चित्र दिसून आले. या निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये काँग्रेसचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.
विजयी उमेदवारांनी सर्वप्रथम लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श ठेवून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. विलासराव देशमुख यांनी सुरू केलेल्या विकासाभिमुख धोरणांमुळे जिल्ह्याची ओळख राज्यभर निर्माण झाली असून त्याच परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारण्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समिती पातळीवर काँग्रेसला मिळालेल्या या यशामुळे आगामी काळात जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित सदस्य पुढाकार घेतील. असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
Latur Crime News: लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन सराईत चोरटे अटकेत
जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या महाराणा प्रतापनगर, पांखरसांगवी, काटगाव, हरंगुळ बु., साकोळ, तांदुळजा यांसह विविध भागांतील विजयी उमेदवारांनी बाभळगाव येथे एकत्र येत विजयाचा आनंद साजरा केला. बाभळगाव येथील निवासस्थानी आ. अमित देशमुख, माजी आ. धीरज देशमुख तसेच विलास साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकत्यांनी जिल्ह्यातील विकासकामांना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. मतदारांनी काँग्रेसवर
दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि शेती विकासासाठी प्रभावी काम करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित सदस्यांनी दिले.