
धारूर शिवारात अवकाळीचा तडाखा; आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी
नुकसानीची तीव्रता पाहता आमदार कैलास पाटील यांच्यासोबत तहसीलदार मृणाल जाधव, तालुका कृषी अधिकारी राहुल दिवाणे आणि महसूल व कृषी विभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गावांमधील अनेक शेतकऱ्यांनी आमदारांकडे आपल्या व्यथा मांडल्या. पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, अशी भावना यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
पाहणी दरम्यान आमदार कैलास पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, नुकसानीचा कोणताही भाग सर्वेक्षणातून सुटता कामा नये. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करावेत आणि त्याचा अहवाल शासनाकडे सादर करावा, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळेल.
शेतकऱ्यांचा मोठा सहभाग या पाहणी दौऱ्यावेळी धारूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन थेट बांधावर आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा दिलासा पाहायला मिळाला.
धाराशिव तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत भयंकर वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा दिला. धारूर, केशेगाव, कोल्हेगाव आदी परिसरात या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विठ्ठलवाडी येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन आकाश काळवंडले आणि काही क्षणातच जोरदार वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर मुसळधार पावसासह मोठ्या आकाराच्या गारांचा मारा झाला. विशेषतः धारूर परिसरात गारपीट इतकी तीव्र होती की, शेतजमिनींसह रस्तेही गारांच्या थराने पांढरेशुभ्र झाले. अनेक ठिकाणी गारांचा खच साचल्याने जणू बर्फवृष्टी झाल्याचा भास होत होता.