• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Election Commission Should Reconsider Its Impartial Behavior Nrkk

“निवडणूक आयोगाने आपल्या ‘निःपक्षपाती’ वर्तवणूकीवर स्वत:च चिंतन करावं”

कोरोना किंवा ओमायक्रोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित निवडणूक घेण्यासाठी नियमावली लागू करू, असे मुख्य निवडणूक आयोगाने सांगितले, पण ही नियमावली नक्की कोणासाठी? विरोधकांनी ती पाळायची व सत्ताधाऱ्यांनी धुडकावली तरी निवडणूक आयोगाने त्याकडे कानाडोळा करायचा, हे प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही स्पष्टपणे जाणवले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर असताना व निवडणूक आयोगाने काही बंधने घातली असताना पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह जबाबदार पदांवर असलेले लोक लाखालाखांच्या सभा घेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करताना दिसत होते.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Jan 10, 2022 | 07:58 AM
“निवडणूक आयोगाने आपल्या ‘निःपक्षपाती’ वर्तवणूकीवर स्वत:च चिंतन करावं”
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पाच राज्यांतील निवडणुका कोविडच्या विळख्यात सापडल्या आहेत. या सगळ्यांपासून निवडणूक कर्मचारी सुरक्षित राहोत व निवडणुका व्यवस्थित पार पडोत हिच अपेक्षा. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. तरीही लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका वेळेवर घेणे गरजेचे असते, असे निवडणूक आयोगास वाटत असेल तर घटनात्मक तरतुदीनसार करायच्या इतर अनेक गोष्टी का डावलल्या जातात, या वर एकदा मंथन व्हायलाच हवे! असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून निवडणूक आयोगावर निषाणा साधण्यात आला आहे.

काय म्हटलंय सामता?

देशभरात कोरोनाची तिसरी लाट उसळली आहे. जवळजवळ सर्वच राज्यांत रात्रीची संचारबंदी व दिवसाची जमावबंदी लागू आहे. अशा अस्वस्थ वातावरणात आपल्या कर्तव्यदक्ष निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेची घोषणा केली तेव्हा अनेकांना वाटले की, पाच राज्यांतील निवडणुका पुढे ढकलल्याचे जाहीर केले जाऊ शकेल, पण तसे झाले नाही. कोरोनाची काळजी घेत निवडणुका घेऊ असे त्यांनी जाहीर केले.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या पाच राज्यांत 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. 10 मार्च रोजी मतमोजणी होईल. म्हणजे साधारण एक महिन्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कोरोना संकट असले तरी निवडणूक टाळणे घटनात्मक बंधनांमुळे शक्य नाही आणि वेळेत निवडणुका घेणे ही आयोगाची जबाबदारी असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले आहे.

कोरोना किंवा ओमायक्रोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरक्षित निवडणूक घेण्यासाठी नियमावली लागू करू, असे मुख्य निवडणूक आयोगाने सांगितले, पण ही नियमावली नक्की कोणासाठी? विरोधकांनी ती पाळायची व सत्ताधाऱ्यांनी धुडकावली तरी निवडणूक आयोगाने त्याकडे कानाडोळा करायचा, हे प. बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही स्पष्टपणे जाणवले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर असताना व निवडणूक आयोगाने काही बंधने घातली असताना पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह जबाबदार पदांवर असलेले लोक लाखालाखांच्या सभा घेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करताना दिसत होते.

प. बंगालातील निवडणुकीत आयोगाची वर्तणूक खरेच निःपक्षपाती होती काय, याचे चिंतन त्यांनी स्वत:च केले पाहिजे. अनेक खोटी प्रकरणे निर्माण करून त्यावर गोंधळ घातला गेला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राम मतदारसंघातून आधी विजयी घोषित केले व नंतर निकाल फिरविण्यात आला. लोकमताचा प्रचंड रेटा होता म्हणून प. बंगालात ममता बॅनर्जींचा विजय केंद्रीय यंत्रणा रोखू शकली नाही.

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. घटनात्मक बंधने तेव्हाही होतीच. त्याचे पालन झाले काय? पण सुशील चंद्रा यांनी आता पाच राज्यांतील निवडणुकांत घटनेची बूज राखण्याची भाषा केली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

पाच राज्यांतील निवडणुका कोविडच्या विळख्यात सापडल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे हे निवडणूक आयोगाने मान्य केले. त्यामुळे सभा, पदयात्रांवर 15 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. उमेदवारांनी समाजमाध्यमांवर ऑनलाइन प्रचार करावा, असे निवडणूक आयोगाने सुचवले आहे.

भारतीय जनता पक्ष याबाबतीत सगळ्यात पुढे व जोरात असतो. समाजमाध्यमांवरील प्रचारासाठी त्यांच्या सायबर फौजा तत्पर असतात व हा पक्ष त्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करीत असतो. भारतीय जनता पक्षाच्या मैदानी प्रचार सभांना मिळणारा प्रतिसाद सध्या थंडावला आहे. पंतप्रधान मोदी हे फिरोजपूरला प्रचारासाठी निघाले व मध्येच अडकले, पण प्रत्यक्ष प्रचार सभेच्या ठिकाणी लोक फिरकलेच नाहीत. खुर्च्या रिकाम्या होत्या हे चित्र समोर आले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल. इतर राजकीय पक्षांचे ‘आयटी’ सेल भाजपच्या तुलनेत तोकडे असले तरी प्रभावी आहेत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीचे लोक समाजमाध्यमांवर घोडदौड करताना दिसतात, पण वृत्तवाहिन्या व डिजिटल माध्यमांवर सरकार म्हणून भाजपचा दबाव आहेच.

पाच राज्यांतील निवडणुका कोविडच्या विळख्यात सापडल्या आहेत. या सगळ्यांपासून निवडणूक कर्मचारी सुरक्षित राहोत व निवडणुका व्यवस्थित पार पडोत हिच अपेक्षा. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. तरीही लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका वेळेवर घेणे गरजेचे असते, असे निवडणूक आयोगास वाटत असेल तर घटनात्मक तरतुदीनसार करायच्या इतर अनेक गोष्टी का डावलल्या जातात, या वर एकदा मंथन व्हायलाच हवे!

Web Title: Election commission should reconsider its impartial behavior nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2022 | 07:58 AM

Topics:  

  • Saamana Editorial

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आनंद हरतालिकेचा, मनी हा दाटला….! लाडक्या प्रियजनांना पाठवा हरतालिकेच्या मंगलमय शुभेच्छा, वाचून होईल आनंद

आनंद हरतालिकेचा, मनी हा दाटला….! लाडक्या प्रियजनांना पाठवा हरतालिकेच्या मंगलमय शुभेच्छा, वाचून होईल आनंद

Devendra Fadnavis: “… या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis: “… या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

अनेक घरं अन् संसार केले उद्ध्वस्त; ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’

अनेक घरं अन् संसार केले उद्ध्वस्त; ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’

मावळातील गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कारवाई; टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर

मावळातील गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कारवाई; टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर

झेलेन्स्कींना फसवत आहेत ट्रम्प? रशिया कीववर डागतोय क्षेपणास्त्र, पण युक्रेनला ‘हे’ शस्त्र वारण्याची नाही परवानगी, कारण काय ?

झेलेन्स्कींना फसवत आहेत ट्रम्प? रशिया कीववर डागतोय क्षेपणास्त्र, पण युक्रेनला ‘हे’ शस्त्र वारण्याची नाही परवानगी, कारण काय ?

श्री गणेश मंदिर, मॉरिशस : परदेशातही दरवळणारी भारतीय संस्कृतीची सुवासिक ज्योत

श्री गणेश मंदिर, मॉरिशस : परदेशातही दरवळणारी भारतीय संस्कृतीची सुवासिक ज्योत

Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.