सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, 'हे भ्याड सरकार आहे,' म्हणत केला हल्लाबोल
दिल्लीतील जंतरमंतर मैदानात सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या ठिकाणाहून दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने सोनम वांगचुक यांना उचलून नेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. इतकेच नव्हे तर, सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनाही पोलिसांनी मारहाण करत त्यांना डांबून ठेवण्यात आले. यामुळे जंतरमंतरवर काही वेळासाठी मोठा गोंधळ उडाला होता. यावरून देशभरात मोठा गोंधळ उडाला असून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. अश्यातच आता राजकीय नेत्यांकडूनही या कारवाईला विरोध होत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत आपला रोष व्यक्त केला आहे.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 21 वा दिवस होता. NEET परीक्षांच्या पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन दिल्लीतील जंतर मंतर येथे पार पडत आहे. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राष्टवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत या कारवाईचा निषेध केला आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून रोहित पवार म्हणाले, “एक निस्पृह व्यक्ती आपल्या ध्येयापासून हटत नसल्याचं दिसताच घाबरलेल्या केंद्र सरकारने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हलवून रुग्णालयात दाखल केलं. यातून केंद्र सरकारला नेमका काय संदेश द्यायचाय? आम्ही आंदोलन मोडून काढू, पण आंदोलकांची मागणी मान्य करणार नाही, हाच तो संदेश आहे ना? अशी जबरदस्ती करण्यापेक्षा सरकार निष्क्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही? सरकारचा हा अहंकार लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे!”
एक निस्पृह व्यक्ती आपल्या ध्येयापासून हटत नसल्याचं दिसताच घाबरलेल्या केंद्र सरकारने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उपोषणस्थळावरून हलवून रुग्णालयात दाखल केलं. यातून केंद्र सरकारला नेमका काय संदेश द्यायचाय? आम्ही आंदोलन मोडून काढू, पण… — Rohit Pawar (@RRPSpeaks) July 18, 2026
जयंत पाटील म्हणाले, “सोनम वांगचुक यांच्या मागण्यावर विचार न करता आंदोलन दडपण्यासाठी त्यांना आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन दवाखान्यात हलवल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. लोकशाहीत आंदोलनाचा आणि मत मांडण्याचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने आंदोलकांच्या मागण्यांवर संवेदनशीलतेने चर्चा करून मार्ग काढावा. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज ऐकला गेला पाहिजे.”
सोनम वांगचुक यांच्या मागण्यावर विचार न करता आंदोलन दडपण्यासाठी त्यांना आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन दवाखान्यात हलवल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. लोकशाहीत आंदोलनाचा आणि मत मांडण्याचा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने आंदोलकांच्या मागण्यांवर… — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 18, 2026
जितेंद्र आव्हाड याबाबत भाष्य करत म्हणाले, “हे भ्याड सरकार आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवले.यासोबतच आंदोलनकर्त्यांवर देखील पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.”
हे भ्याड सरकार आहे.
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने हटवले.यासोबतच आंदोलनकर्त्यांवर देखील पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला.
गेल्या 20 दिवसापासून सोनम हे आंदोलनाला बसले होते.पण या गेंड्याच्या कातडीच्या… pic.twitter.com/P3CfuW8xfX — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 18, 2026
“गेल्या 20 दिवसापासून सोनम हे आंदोलनाला बसले होते.पण या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने त्यांच्याशी साधी चर्चा करण्याचा देखील शिष्टाचार दाखवला नाही. हा सत्तेचा माज आहे,जो कायम चालणार नाही हे इथल्या उन्मत्त सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यावे..!”






