
कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक? अकोल्यात कर्जमाफीच्या ‘फसव्या’ अध्यादेशाची होळी; राज्यभर आंदोलनाचा इशारा
या फसव्या निर्णयाच्या निषेधार्थ किसान सभेने राज्यभर शासन आदेशाची होळी करण्याची हाक दिली होती. यानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील महात्मा फुले चौकात शेतकऱ्यांनी एकत्र येत कर्जमाफी अध्यादेशाचे दहन केले. उद्या आणि परवा सलग दोन दिवस राज्यभर हे होळी आंदोलन सुरू राहणार आहे.
२०१९ च्या कर्जदारांवर अन्याय:- २०१९ मध्ये कर्जमाफी घेतलेले तब्बल ३२ लाख २९ हजार शेतकरी जर यावेळी थकीत असतील, तरी त्यांना केवळ ५० हजार रुपयांच्या मर्यादेतच कर्जमाफी दिली जाणार आहे.
नियमित कर्जदारांची बोळवणूक: नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही केवळ ५० हजार रुपयेच मिळणार असून, त्यांना किमान दोन वर्षे नियमित कर्जदार असण्याची कडक अट घालण्यात आली आहे.
सहकार क्षेत्रातील कर्मचारी वंचित: अत्यंत अल्प पगारावर काम करणाऱ्या सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या कर्जमाफीतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.
Sanjay Raut PC: विधान परिषद आता सभागृह नाही तर ‘डम्पिंग ग्राउंड’ झालेय! संजय राऊतांचा थेट घणाघात
“निवडणुकीपूर्वी २ लाखांची कर्जमाफी जाहीर करून आता मात्र अटींचा खोळंबा घालत बहुतांश शेतकऱ्यांना ५० हजारांत गुंडाळण्याचा सरकारचा हा डाव संतापजनक आहे.” अशी प्रतिक्रिया डॉ. अजित नवले (राज्य सरचिटणीस, किसान सभा) यांनी दिली.
१. कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या सर्व जाचक अटी तातडीने रद्द कराव्यात.
२. सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
३. नियमित कर्जदार शेतकरी, शेडनेट, पॉलीहाऊस आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व प्रकारची पीक व शेती सुधारणा कर्जे माफ करावीत.
अकोले येथील आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या या फसवणुकीविरोधात संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त होत असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे.