
Raigad Zilla Parishad: उरण तालुक्यात निवडणुकीची रणधुमाळी; ७ फेब्रुवारीला होणार मतदान
Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उरण तालुक्यात जोरात सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
१ फेब्रुवारी हा रविवार सुट्टीचा दिवस असल्याने उरण तालुक्यातील चिरनेर, जासई, नवघर व चाणजे या चार जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये प्रचाराला वेग आला आहे. भाजप, महाविकास आघाडी, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) या पक्षांचे उमेदवार घरोघरी प्रचार फेऱ्या, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या चार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आठ मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Raigad News: पनवेलचा महापौर १० तारखेला ठरणार! महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी विशेष सभेचे आयोजन
उरण तालुक्यातील चिरनेर, जासई, नवघर व चाणजे या चार जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शेकाप व काँग्रेस यांची महाविकास आघाडी असा सरळ सामना रंगणार आहे. मात्र आवरे पंचायत समिती गणातून मनसेने, चाणजे पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदे गटाने), तर केगाव व नवघर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. उरण पंचायत समितीच्या चार गणांमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
एकूणच रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रत्येक गाव, आदिवासी वाड्या-वस्त्यांमध्ये प्रचार रॅल्या, मतदारांच्या भेटीगाठी तसेच जेवणावळीचे आयोजन केल्याचे दिसून येत आहे. आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, उरण तालुक्यातील चारही जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
Karjat News : निवडणूक प्रचाराचा गैरफायदा घेत अनधिकृत बांधकामधारकांचा सुळसुळाट; नेमकं प्रकरण काय ?
दरम्यान, भेडखळ, जासई, चिरनेर व विधाणे या पंचायत समितीच्या चार गणांमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा बेट सामना होणार आहे. भाजपचे आमदार महेश बालदी व माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मात्र या चारही जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये आजही शिवसेना (उबाठा गट), शेकाप व काँग्रेसची मजबूत पकड असल्याचे बोलले जात आहे.