
Mahrashtra Politics: "... शंका बळावत चालली आहे" अजित पवार प्लेन क्रॅश प्रकरणात सपकाळांचे भाष्य
निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर
नियमांची पायमल्ली केली जात असल्याच्या आरोप
शरद पवारांच्या राज्यसभेच्या विषयावर केले भाष्य
नंदुरबार: आज राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. 9 तारखेला म्हणजेच सोमवार निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड, बंद पडणे असे प्रकार सोडल्यास मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्यातच निवडणूक, अजित पवारांचा विमान अपघात याविषयी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले आहे.
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “गेलया दोन निवडणुकांमध्ये जो कित्ता गिरवण्यात आला होता, तोच कित्ता आता प्रशासनाच्या वतीने गिरवला जात आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर आणि नियमांची पायमल्ली केली जात आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेची खिल्ली उडवली जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य लोकशाहीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे.”
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “शरद पवारांना राज्यसभेवर पुन्हा खसदार करण्यासाठी आमच्याकडे संख्याबळ असल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यांनी जे विधान केले आहे ते महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल. शरद पवारांना मुळात इच्छा आहे का? हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.”
Maharashtra Politics: “गरज पडल्यास….”; EVM मध्ये बिघाड झाल्यावर रामदास कदम आक्रमक
“अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासण्याची मागणी शरस पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. अजित पवारांच्या अपघातावेळेस वेगवेगळ्या बातम्या, माहिती समोर येत होती. महाराष्ट्राचे आणि केंद्रातील सरकार झोपा काढत आहे. आतापर्यंत चौकशी होऊन अहवाल समोर यायला हवा होता. आता बॉम्बस्फोटांपर्यंतचे प्रश्न आहेत ते अनुत्तरित आहेत आणि अनुत्तरीत प्रश्नांमुळे शंका बळावत चालली आहे,” असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
शिरोळ तालुक्यात चुरशीने मतदान; अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा
रामदास कदम आक्रमक
शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम म्हणाले, “ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. मतदार करत असलेल्या मताची किंमत ही अनमोल, अमूल्य अशी आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी लेखता येणार नाही. मशीनमध्ये बिघाडाची मी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. या प्रकरणी मी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहे. शासन, निवडणूक आयोगाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे. गरज पडल्यास बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, मला त्यात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनातील संशय दूर होईल.”