चेंबूरमध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. यामध्ये एका कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(फोटो - सोशल मी़डिया)
चेंबूर : मुंबईतील चेंबूर भागामध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. यामध्ये 5 लोकांची दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत बांधलेल्या दुकानला आग लागली आणि पसरतच राहिली. मुंबई पोलीस आणि अग्निशमन विभागाला रविवारी, 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.20 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. एका इमारतीच्या तळमजल्यावर बांधलेल्या दुकानात आग लागली. ही आग पसरत गेल्याने तिचा भडका वाढला. इमारतीच्या एका मजल्यावर दुकान असून वर कुटुंब राहत होते. या कुटुंबातील सर्वांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे.
एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला
या अपघातात गुप्ता परिवारातील सर्वांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पती-पत्नी, दोन मुले आणि एका नातेवाईक यांना जीव गमवावा लागला. मृतांमध्ये 30 वर्षीय प्रेम गुप्ता, 30 वर्षीय मंजू प्रेम गुप्ता, 39 वर्षीय अनिता गुप्ता, 10 वर्षीय निष्पाप नरेंद्र गुप्ता आणि 7 वर्षीय मुलगी पॅरिस गुप्ता यांचा समावेश आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांनी या कुटुंबाला बाहेर काढले. आणि तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
इलेक्ट्रिक वायरिंगमुळे आग लागण्याचा धोका
या भीषण आगीत इमारतीमध्ये तळमजल्यावर असलेल्या दुकानातील इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आदींसह व वरील घरातील इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आदी साहित्य जळून खाक झाले. ती एक दुमजली इमारत होती, ज्यात खाली दुकान चालू होते आणि वर एक कुटुंब राहत होते.