Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनच्या पाण्याची गुणवत्ता कितपत योग्य? शुद्धतेचे काय? यवतमाळात रोज हजारो लिटर पाण्याची विक्री

यवतमाळ शहरात या पाण्याच्या व्यापारातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र पाण्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्षच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2026 | 01:23 PM
कॅनच्या पाण्याची गुणवत्ता कितपत योग्य? शुद्धतेचे काय? यवतमाळात रोज हजारो लिटर पाण्याची विक्री

कॅनच्या पाण्याची गुणवत्ता कितपत योग्य? शुद्धतेचे काय? यवतमाळात रोज हजारो लिटर पाण्याची विक्री

Follow Us
Close
Follow Us:

आता उन्हाळा तापू लागला असून कॅनच्या पाण्याचा धंदाही तेजीत आला आहे. पण शहरात दररोज कॅनद्वारे विक्री होणाऱ्या थंडगार पाण्याच्या शुद्धतेची शाश्वती कोण देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ उन्हाळाच नव्हेतर शहरात वर्षभर पाणी विकत घेण्याचा ट्रेंड आहे. मात्र पाण्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्षच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.जमिनीतून पाणी उपसा करून त्याचा कॅनद्वारे पुरवठा करणारे व्यावसायिक आता चौका चौकात प्लँट सुरू करून बसलेले आहेत. पण या व्यापारावर नियंत्रण कोण ठेवणार याची प्रशासनातच स्पष्टता नाही. अशा प्लॅटवर कारवाईचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन, नगर परिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत.(फोटो सौजन्य – istock)

Amravati News : पूर्णा नदी पात्रात पोकलेनचा ‘धुमाकूळ’, प्रशासनावर प्रश्नचिन्ह; रेतीचा बेकायदेशीर उपसा सुरुच

पण यापैकी कुणीही गेल्या काही दिवसात कारवाई केल्याचे दिसून आले नाही. एवढेच काय, यवतमाळ शहरात नेमके किती प्लॅट आहे, दरदिवशी जमिनीतून किती पाण्याचा उपसा होतो, किती रुपयाला कॅन विकली जाते, त्यासाठी किती डिपॉझिट घेतले जाते, त्याची वाहतूक व पुरवठादार कोण, याबाबतची सविस्तर माहितीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही. उलट आमच्याकडे प्लँटबाबत कुणी तक्रारीच केल्या नाही, असे सांगून प्रशासन हात झटकते. शुद्ध पाणीपुरवठ्याच्या नावाखाली केवळ थंड पाणी नागरिकांना दिले जाते. त्यामुळे यवतमाळकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकही या पाण्याच्या शुद्धतेकडे फारसे लक्ष देत नाही. त्याचाच फायदा घेत पाणीपुरवठादारांकडून लूट सुरू आहे.

कुणी ३० रुपयाला तर कुणी ४० रुपयाला पाण्याची कॅन (कुलकेज) विकत आहे. शिवाय कॅनच्या किमतीएवढे डिपॉझिटही घेतले जात आहे. यवतमाळ शहरात या पाण्याच्या व्यापारातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमांमध्ये तर सर्रास अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. एकीकडे प्रशासनाने सामान्य नागरिकांना बोरवेल खोदण्यासाठी नियम घालून दिले आहे. तर दुसरीकडे थंडगार पाण्याचा व्यापार करणारी मंडळी दररोज जमिनीतून हजारो लिटर पाण्याचा उपसा करीत आहे. या व्यवहाराचे प्रशासनाकडे कुठलेचे रेकॉर्ड नसल्याने पाणीपुरवठादारांनी प्राप्तीकर, जीएसटी भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातसुद्धा पाण्याचा हा व्यापार सुरु आहे.

Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका

नाईलाज आणि लूट उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात. त्यामुळे थंडगार पाणी विकत घेणे हाच एकमेव आधार उरतो. त्याचा फायदा उठवत व्यावसायिकांनी लूट सुरू केली आहे. यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत पाण्याचे प्लॅट सुरु आहेत. त्याद्वारे रोज हजारो कॅनचा घरोघरी पुरवठा केला जात आहे. मात्र येथे नियम पाळले जातात का, हे पाण्यासाठी यंत्रणेला सवडच मिळत नाही.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: How good is the quality of canned water what about purity sale of thousands of liters of water daily in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Water Shortage
  • Yavatmal
  • yavatmal news

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचे ५० बिबटे होणार अंबानींचे पाहुणे! वनताराला पाठवून मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न
1

महाराष्ट्राचे ५० बिबटे होणार अंबानींचे पाहुणे! वनताराला पाठवून मानव-प्राणी संघर्षाला आळा घालण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

खेडमधील ३३ गावे, ५० वाड्यांमध्ये टंचाईचा दाह; पाणीसाठा झपाट्याने कमी
2

खेडमधील ३३ गावे, ५० वाड्यांमध्ये टंचाईचा दाह; पाणीसाठा झपाट्याने कमी

नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण
3

नागझिरात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन! पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी छायाचित्रात टिपला अनमोल क्षण

Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद
4

Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.