Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद पवार गट किती जागा जिंकणार? जयंत पाटील यांनी थेट सांगितला आकडा

यंत पाटील यांनी येत्या निवडणूकीमध्ये शरद पवार किती जागा जिंकेल याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 20, 2024 | 01:40 PM
शरद पवार गट किती जागा जिंकणार? जयंत पाटील यांनी थेट सांगितला आकडा
Follow Us
Close
Follow Us:

सांगली – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून दोन्ही आघाडी विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी देखील जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रचारसभेमध्ये विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. त्याचबरोबर जयंत पाटील यांनी येत्या निवडणूकीमध्ये शरद पवार किती जागा जिंकेल याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

10 पैकी 7 जागा जिंकल्या आहेत

प्रचारसभेमध्ये बोलताना जयंत पाटील म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील आणि जानकर यांच्या निर्णयाचा राज्यभर परिणाम दिसत आहे. 10 पैकी 7 जागा शरद पवार गटाने जिंकल्या आहेत, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. तसेच “सध्या महायुतीत असणारे भाजप, अजितदादा आणि शिवसेना यांच्याकडील 12 ते 15 जणांनी राष्ट्रवादीत येण्याचा शब्द दिला असून लोकसभेनंतर ही सर्व मंडळी शरद पवार गटात येतील,” असा धक्कादायक दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर “हे नेमके कोण आहेत याचा तपशील सांगून मी त्यांना अडचणीत आणणार नाही? थोडे दिवस जाऊ दे असे सांगत दिल्लीत सत्तांतर होणार आणि महाराष्ट्रात सत्तांतर होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे,” असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

माढ्याचा निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही

पुढे त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघाबाबत वक्तव्य केले. जयंत पाटील म्हणाले, “माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील उभे असून उत्तम जानकर यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते व जानकर एकत्र आल्याने माढ्याचा निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही असे सांगितले. माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकर लढण्यास इच्छुक असून त्यांना आम्ही येथून आमदार करणार असा शब्दही दिला आहे,” असे देखील जयंत पाटील म्हणाले आहेत.

Web Title: How much will sharad pawar group will win loksabha elections seats in maharashtra jayant patil told number nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2024 | 01:40 PM

Topics:  

  • jayant patil
  • LOKSABHA ELECTION
  • loksabha election 2024
  • Nationalist Congress Party
  • political news

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणासाठी मुस्लिम मावळा हाजी गफूर पठाण मैदानात…! मराठा बांधवांना पाठवला मायेचा घास 
1

मराठा आरक्षणासाठी मुस्लिम मावळा हाजी गफूर पठाण मैदानात…! मराठा बांधवांना पाठवला मायेचा घास 

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये? गणेशोत्सवानंतर आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता
2

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये? गणेशोत्सवानंतर आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”
3

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खाऊगल्ली बंद; सरकारच्या फतव्यामुळे आंदोलकांचे होणार हाल?
4

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खाऊगल्ली बंद; सरकारच्या फतव्यामुळे आंदोलकांचे होणार हाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.