
(फोटो सौजन्य-Gemini)
Sangli Election 2026 : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रभर मतदानासाठी मोठा उत्साह आहे आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लोक मतदान केंद्रांवर गर्दी करत आहेत. अशातच सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील देवर्डे येथील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली.
देवर्डे येथील मतदान केंद्रावर मॉक पोल (ट्रायल) दरम्यान मतदान यंत्र (EVM) अचानक बंद पडल्याने खळबळ उडाली. 7 फेब्रुवारीला सकाळी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशासकीय नियमानुसार उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतदान यंत्राची चाचणी घेतली जात असते. देवर्डे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील मतदान केंद्रावर ही प्रक्रिया सुरू असतानाच मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि यंत्र बंद पडले. यामुळे मतदानाच्या नियोजित वेळेत अडथळा निर्माण होऊन सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प राहिली. मशीन बंद पडल्याची माहिती मिळताच केंद्रावरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला.
निवडणूक विभागाने राखीव संचामधून नवीन मतदान यंत्र उपलब्ध करून दिले. बिघडलेले मशीन बदलल्यानंतर पुन्हा एकदा मॉक पोल घेऊन मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. सकाळच्या वेळेत मतदानासाठी आलेल्या नागरिकांना या तांत्रिक बिघाडामुळे काही काळ ताटकळत उभे राहावे लागले. मात्र प्रशासनाने वेळेत यंत्र बदलल्याने मतदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि पुन्हा उत्साहाने मतदानासाठी रांगा लावल्या. सध्या देवर्डे परिसरात शांततेत आणि सुरळीतपणे मतदान सुरू आहे, अशी प्रतिक्रिया देवर्डे येथील रहिवासी नागरिक रमेश पंडित जाधव यांनी दिली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी आहे की, सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. या निडणुकीवर तासगाव तालुक्यातल्या बलगवडे येथीन ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गावात सुमारे १२५,००० झाडे तोडण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून गावातील गायरान जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प विकसित केला जात आहे.
फक्त याच कारणास्तव, ग्रामस्थांनी बेकायदेशीरपणे लावेली झाडांची कत्तल सुरू केली आहे. त्यामुळे इतरत्र ग्रामीण सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय निष्फळ ठरला असता. त्यानुसार, बालगावडेचे ग्रामस्थ आज होणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकत आहेत आणि गाव बंद ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, बालगावडे गावात २३०० मतदार आहेत. दोन्ही मतदान केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे. दुपारी किंवा गावात एकही मतदान झाले नाही. गावकऱ्यांच्या या निर्णयाबाबत आता प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी काय तोडगा काढणार? गावकऱ्यांची कशी समजूत काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.