Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2026 : लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेची इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात; केमिकलयुक्त प्रदूषणामुळे वारकऱ्यांची चिंता वाढली

आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना पवित्र इंद्रायणी नदीचे पात्र केमिकलयुक्त पाण्यामुळे फेसाळली आहे. वारीत लाखो वारकरी इंद्रायणीत स्नान करून माऊलींच्या दर्शनाला जात असल्याने या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त होत आहे. केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे नदीचे पाणी दूषित झाल्याचा आरोप होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 03, 2026 | 01:21 PM
लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेची इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात; केमिकलयुक्त प्रदूषणामुळे वारकऱ्यांची चिंता वाढली

लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेची इंद्रायणी प्रदूषणाच्या विळख्यात; केमिकलयुक्त प्रदूषणामुळे वारकऱ्यांची चिंता वाढली

Follow Us
Follow Us:
  • आषाढी वारीपूर्वी इंद्रायणी नदी फेसाळली
  • केमिकलयुक्त प्रदूषणामुळे वारकऱ्यांची चिंता वाढली
  • फेसाळलेल्या पाण्याने पर्यावरणाचा गंभीर प्रश्न
  • तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Ashadhi Wari 2026 News Marathi : आषाढी वारी (Ashadhi Wari 2026) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना वारकऱ्यांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पांढरा फेस साचल्याचे समोर आले असून, केमिकलयुक्त सांडपाणी नदीत मिसळत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

आषाढी वारीसाठी राज्यभरातून लाखो वारकरी देहू आणि आळंदी येथे दाखल होतात. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यापूर्वी अनेक वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करून हे पवित्र पाणी तीर्थ म्हणून ग्रहण करतात. त्यामुळे नदीच्या प्रदूषणामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, औद्योगिक तसेच रासायनिक सांडपाणी आणि काही ठिकाणचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने पाण्यावर फेस तयार होत आहे. या फेसामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता खालावत असून जलचरांनाही त्याचा फटका बसत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका

तसेच पिंपरी-चिंचवड हद्दीतून मोठ्या प्रमाणात जलपर्णी सोडण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास रसायनयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे आळंदीतील इंद्रायणी नदी सायंकाळनंतर रात्रभर साबणाच्या पाण्याप्रमाणे फेसाने तरंगताना दिसत होती. ऐन वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदी जलप्रदूषणाने मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे.

पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रदूषणाची तातडीने दखल घेऊन नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याची तपासणी करण्याची मागणी केली आहे. संबंधित उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करून नदीचे प्रदूषण रोखावे, अशी मागणीही पुढे येत आहे. दरम्यान, वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक इंद्रायणी नदीत स्नान करणार असल्याने प्रशासनाने पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून आवश्यक असल्यास तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारकरी संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. इंद्रायणी नदी ही केवळ जलस्रोत नसून वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता जपण्यासाठी प्रदूषणावर कठोर नियंत्रण ठेवणे, बेकायदेशीर सांडपाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करणे आणि नदी संवर्धनासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

Web Title: Indrayani river foaming chemical pollution before ashadhi wari 2026 news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Indrayani River
  • pandharpur

संबंधित बातम्या

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी
1

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका
2

सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी
3

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत
4

आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! भाविकांची मागणी होताच गावात पोहोचणार विशेष बस; ज्येष्ठांना मोफत, महिलांना 50% सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.