
भाजप नेते पंकज भोयर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचवेळी विरोधकांच्या विस्कळीत नियोजनावरही जोरदार टीका केली आहे. “आजच्या निकालात महायुतीला मिळणारे यश हे सरकारने गेल्या अडीच वर्षांत केलेल्या विकासकामांची पावती आहे. जनतेने विरोधकांना पूर्णपणे नाकारले आहे. काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच त्यांच्यावर स्वबळावर लढण्याची वेळ आली,” असे मत भोयर यांनी व्यक्त केले. (Maharashtra Politics)
उद्धव ठाकरेंसमोर विधान परिषदेचे मोठे आव्हान यावेळी भोयर यांनी उद्धव ठाकरे यांच्या आगामी राजकीय अडचणींकडेही लक्ष वेधले. १३ मे २०२६ मध्ये ठाकरे यांची विधान परिषदेची मुदत संपत असून, सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार त्यांच्याकडे केवळ २० आमदार आहेत. निवडून येण्यासाठी आवश्यक असलेला ३० मतांचा कोटा गाठणे ठाकरेंसाठी कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले. “काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या मदतीशिवाय त्यांना पुन्हा निवडून येणे शक्य नाही, परंतु महाविकास आघाडीत राज्यसभेवरून सुरू असलेली ओढाताण पाहता ठाकरेंची वाट खडतर दिसते,” असा टोलाही त्यांनी लगावला.
सयाजी शिंदेंच्या राजकारणावरून टोला प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सक्रिय राजकारणाबाबत बोलताना भोयर यांनी आश्चर्य व्यक्त केले. “ते उत्तम अभिनेते आहेत, पण ते अचानक सक्रिय राजकारणात चर्चा कधीपासून करायला लागले? यावर विश्वास बसत नाही,” अशा शब्दांत त्यांनी शिंदेंच्या राजकीय भूमिकेवर टिप्पणी केली.
त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनीदेखील याच मुद्द्यावरून ठाकरे गटाला डिवचलं आहे. ” विधानपरिषदेची निवडणूक ही संख्याबळावर होत असते. आमच्याकडे २३७ आमदार आहेत. समोरच्यांकडे किती आमदार आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे उगाचच कुणी धाडस करू नये, याची एक कार्यकर्ता म्हणून मला पूर्ण कल्पना आहे.” असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.
Maharashtra EVM Controversy: ढाब्यावर सापडलेल्या ‘त्या’ दोन राखीव ईव्हीएम प्रकरणावर निवडणूक
राज्यातील जिल्हा परिषद निकालांच्या धामधुमीतच आता विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्याचे विधानसभेतील पक्षीय संख्याबळ पाहता महायुतीचे पारडे जड दिसत असून, महाविकास आघाडी आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यासमोर स्वतःची जागा निवडून आणण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
राज्यात सध्या महायुतीकडे २३५ आमदारांचे भक्कम पाठबळ आहे. या संख्याबळाच्या जोरावर महायुतीचे ७ उमेदवार सहजपणे विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे माकप आणि शेकापसह केवळ ४८ आमदारांचे बळ असून, त्यांना आपल्या जागा टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
Eknath Shinde Birthday : गेमचेंजर शिंदे! रिक्षावाला ते मुख्यमंत्री थक्क करणारा राजकीय प्रवास
शिवसेना (ठाकरे गट) कडे विधानसभेत केवळ २० आमदार आहेत. विधान परिषदेची एक जागा जिंकण्यासाठी साधारण २९ ते ३० मतांच्या कोट्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या अतिरिक्त मतांची नितांत गरज भासणार आहे. जर ठाकरेंनी राज्यसभा किंवा विधान परिषदेच्या इतर जागांसाठी मित्रपक्षांना पाठिंबा दिला, तरच त्यांच्यासाठी विधान परिषदेचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात उतरणार की पक्षातील एखाद्या नव्या चेहऱ्याला संधी देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.