उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा राजकीय प्रवास जाणून घेऊ (फोटो - AI)
ठाण्याच्या राजकारणामध्ये दोन नावे कायम घेतली जातात ते म्हणजे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे, लोकांचा नाथ – एकनाथ अशी उपाधी दिल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे राजकारणा समाजाभिमुख राहिले आहे. सामान्य लोकांच्या अडचणी सोडवत त्यांनी सर्वसामान्यांच्या घरात स्थान निर्माण केलं. एकनाथ शिंदे हे स्वतः सामान्य घरातून आल्यामुळे त्यांना लोकांना झळ बसत असल्याची पूर्ण जाणीव होती. एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील दारे या गावाचे आहेत. ९ फेब्रुवारी १९६४ रोजी त्यांचा जन्म झाला.
हे देखील वाचा : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी ठाणे गाठले आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सुरुवातीला रिक्षा चालवली. यानंतर ठाण्यातील राजकारणात आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणामध्ये प्रवेश केला. आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जाऊ लागले. २००१ मध्ये ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेते आणि ००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभा आमदार म्हणून एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये प्रवेश केला. पुढे हाच नेता महाराष्ट्राचे नेतृत्व करेल अशी कोणी कल्पना देखील केली नसेल,
मात्र मनातील स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकद असणारे एकनाथ शिंदे यांचा राजकारणाचा आलेख कायम चढता राहिला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, नगरविकास मंत्री, त्यानंतर मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री अशी पदे सांभाळली आहेत. आनंद दिघेंनंतर शिवसेनेचे ठाण्यामध्ये नेतृत्व आणि पक्षवाढीमध्ये एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र त्यांच्या एका राजकीय खेळीने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून SIR प्रक्रिया सुरू
एकनाथ शिंदे यांच्या एका राजकीय चालीमुळे राज्याच्या राजकारणाचा तख्ता पूर्णपणे बदलला. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेमध्ये अभूतपूर्व असे बंड केले आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कोसळले. २० जून २०२२ रोजी विधानपरिषदेच्या निकालानंतर शिंदे ‘नॉट रिचेबल’ झाले आणि शिवसेनेतील निम्म्याहून अधिक आमदारांसह सुरत आणि गुवाहाटीला पळून गेले. त्यांचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा शह दिला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांचे सरकार कोसळले.
यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत ३० जून २०२२ रोजी महायुतीचे सरकार स्थापन केले. या सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदेंनी केले आणि ते राज्याचे 20 वे मुख्यमंत्री बनले. मात्र एकनाथ शिंदेंच्या या बंडखोरीमुळे राजकारणाला पूर्णपणे वेगळे वळण मिळाले. आज एकनाथ शिंदे यांचा 61 वा वाढदिवस आहे. मात्र अजित पवारांच्या निधनामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.






