
Jalgaon News: जळगाव हादरले!!! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, खडके गावातील पाटील कुटुंबासह परिसरातील काही कुटुंबे १९ ऑगस्ट रोजी जबलपूरजवळ नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या एका आश्रमात गेले होते. सुनील महाराज उर्फ सोनू महाराज यांच्या या आश्रमात नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी अनेक वर्षांपासून अन्नदान केले जाते. याच कारणामुळे परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी भेट देतात.
सर्वजण नदीत स्नान करण्यासाठी गेले होते. आंघोळ झाल्यानंतर लकी नदीच्या बाहेर आला. त्यानंतर काही वेळाने त्याच्या पायाला माती लागल्याचे त्याला जाणवले. ती माती काढण्यासाठी तो पुन्हा पाण्याजवळ गेला. पाय धुण्यासाठी तो नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पुढे गेला असता अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला.
नदीचा प्रवाह वेगात असल्याने लकीला स्वतःला सावरण्याची संधी मिळाली नाही. तो पाण्यासोबत वाहून जाऊ लागला. मुलगा संकटात असल्याचे पाहताच वडील गणेश पाटील यांनी क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा जोर इतका जास्त होता की गणेश पाटील यांनाही प्रवाहासोबत वाहत जावे लागले.
Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने नदी परिसरात शोध सुरू केला. काही काळाच्या प्रयत्नानंतर गणेश पाटील यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र लकीचा अद्याप शोध लागलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून नदीच्या परिसरात प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेची बातमी खडके गावात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने पाटील कुटुंबाचे आयुष्यच बदलून गेले आहे. वडिलांचा मृत्यू आणि मुलाचा अद्याप न लागलेला पत्ता यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. गावातील नागरिकही कुटुंबाच्या या कठीण प्रसंगी त्यांच्या सोबत उभे आहेत.
Jalgaon Crime: घाबरवण्यासाठी केला हवेत गोळीबार; व्हिडिओ काढल्याने …