
कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर शीलार येथे धरण बांधले जाणार आहे.ग्रामीण भाग असणाऱ्या शिलार धरण प्रकल्प पाच गाव तसेच येथील शेतकरी बाधीत होणार आहेत.या धरणाला विरोध करण्यासाठी पाथरज ग्रामपांचयत मधील किकवी गावाजळ एका फार्मऊस येथे संदर्भात बैठक घेण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित झाले होते आणि संभाव्य प्रकल्प ग्रस्त उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या शिलार धरण मंजुर करण्यात आले.मात्र स्थानिक शेतकरी यांचा या धरण प्रकल्पा संदर्भात कोणत्याही प्रकारे माहिती देण्यात आली नाही.
मात्र हा प्रकल्प मंजुर झाल्यापासुन येथील स्थानिक कार्यकर्ते दिनेश रसाळ कार्यवाही या सर्व गोष्टींचे वाचन किकवी येथील सर्व शेतकरी व प्रकल्प बाधीत यांना एकत्र येऊन बैठक पार पाडण्यात आली.मात्र या आगोदार मुंबई उच्च न्यायालय येथे या धरण संदर्भात याचीका दाखल करण्यात आली होती. मात्र तरी सुद्धा समंधीत कंपनी ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकल्प बाधिकत शेतकऱ्यांना न विचारात घेऊन येथे कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र स्थानिक शेकरी ज्या ठिकाणी काम चालु होते तेथे जाऊन हे काम बंद करण्यात आले.
धरणात जमिनी जाणार आहेत अशा शेतकरी वर्गाकडून येणाऱ्या काळामध्ये या बैठकीत बोलण्यात आले की तहसीलदार व प्रांत आधिकारी यांच्यावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.आसा निर्णय किकवी येथे एका फार्मऊस येथे झेलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये दुसरा एक निर्णय घेण्यात आला त्यामध्ये प्रत्येक गावांमधून चार सदस्य निवडणार तसेच यासाठी आम्हाला संघर्ष समिती तयार करणार आहोत.
या माध्यमातून सांगा देणार आहोत तसेच या समितीच्या मार्फत आम्ही अनेक आंदोलने तसेच रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.त्याचवेळी कर्जत मुरबाड राज्यमार्ग रोखण्यात येणार आहे.न्यायालयात जनहित याचिका दाखल असून देखील सरकार धरणाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे.दुसरीकडे कोणतीही शेतकऱ्याला नोटीस नाही आणि कोणत्याही शेतकऱ्यांच्या जमिनीवर धरणाबाबत शिक्का किंवा नोंद नाही.तर धरणासाठी एकाही शेतकऱ्याने जमीन दिलेली नाही आणि असे असताना देखील पूर्ण व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याने या बैठकीत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.या धरणाच्या परिसरात असलेल्या सर्व ग्रामपंचायती यांनी धरणाला विरोध करणारे ठराव केले असून धरण व्हावे यासाठी सरकार करीत असलेल्या धोरणाबद्दल निषेध व्यक्त केला.