नांदेडच्या भाजप नगरसेवकांच्या प्रशिक्षण केंद्राला नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचे कारण ठरली (फोटो- सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या नांदेड महानगर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान कार्यशाळा-२०२६ या कार्यक्रमात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे. शहरात असतानाही अनेक नव्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यशाळेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. नांदेड महानगरात (Nanded News) भाजपाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी, विविध आघाड्या-मोच्र्यांचे कार्यकर्ते तसेच महापालिकेतील नगरसेवक आहेत. मात्र या सर्वांपैकी मोजकेच नगरसेवक कार्यशाळेत उपस्थित होते. (Political News)
सभागृहातील उपस्थिती पाहता कार्यकत्यपिक्षा रिकाम्या खुर्थ्यांची संख्या अधिक असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली. महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून उमेदवारीसाठी तब्बल साडेसहाशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज भरले होते. त्या
तुलनेत प्रशिक्षण कार्यशाळेत २५ टक्के उपस्थितीही दिसून आली नाही. उमेदवारीच्या वेळी उत्साह दाखविणारे अनेक इच्छुक आणि कार्यकर्ते प्रशिक्षणाच्या वेळी मात्र अनुपस्थित राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले.
हे देखील वाचा : दुबे काय तुमचा जावई आहे का? भीमाशंकर दर्शनावरुन रोहिणी खडसेंची सरकारला चपराक
महिलांची उपस्थिती एक टक्क्यांपेक्षा कमी
या कार्यशाळेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. व्यासपीठावर नेतृत्व उपस्थित असले तरी सभागृहात कार्यकर्त्यांची संख्या अत्यल्प असल्याने कार्यक्रमाला अपेक्षित रंग चढला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात महिलांची उपस्थिती एक टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले. प्रशिक्षण कार्यशाळा म्हणजे कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि राजकीय दृष्टिकोन समजून घेण्याची महत्त्वाची संधी असते. अशा कार्यक्रमांत नगरसेवक, पदाधिकारी तसेच स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात हा कार्यक्रम काही मोजक्या नेते आणि कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित राहिल्याची टीका कार्यकर्त्यांतून होत आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीनंतर भाजपात मोठ्या प्रमाणावर ‘इन्कमिंग’ झाले होते. त्यापैकी अनेक नगरसेवक पूर्वी काँग्रेसमधून आलेले असल्याने संघटनात्मक अभ्यासवर्गाचे महत्त्व त्यांच्या उपस्थितीतून दिसून आले नाही, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे देखील वाचा : विरोधक किस झाड की पत्ती! ‘हा’ जिल्हा शिवसेनामय; सर्व पंचायत समित्यांवर…
मराठी भाषा अस्मितेचा श्वास
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शेकडो वर्षांचा इतिहास आणि शासनासोबत जवळपास अकरा वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले. हा दर्जा उशिरा मिळाला असला तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे व तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. ब्ये मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा श्वास म आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मा. मा. जाधव क. यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ब्ये महाराष्ट्र शासन, ग्रंथालय संचालनालय मुंबई ना व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ट नांदेड यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय बर ग्रंथोत्सवाच्या (दि. १५ मार्च) आयोजित बर ‘अभिजात मराठी भाषा व साहित्य’ या 5. परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते द्ध बोलत होते. यावेळी डॉ. जाधव म्हणाले ड की, अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे न हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव ना होय. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून गी ती समाजातील वेदना, संघर्ष आणि दुःख है. व्यक्त करणारे प्रभावी माध्यम आहे.






