Maharashtra government meeting by cm Devendra Fadnavis on the India-Pakistan war
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झालं आहे. यामुळे देशाच्या उत्तरेकडील सीमा भागांतील राज्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. जम्मू काश्मीरसह पंजाब, राजस्थान, गुजरात आणि पंजाब या राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने पार पडलेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “येत्या दोन ते तीन दिवसांत नौदल, वायूदल, लष्कर, भारतीय तटरक्षक दल यांच्याशीही चर्चा होईल. महाराष्ट्र शासनाकडून जे काही सहकार्य हवं असेल त्याबाबतही चर्चा होईल. आज सुरक्षा सचिवांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने सगळ्यांनाच अलर्ट करण्याची चर्चा आज झाली. तसंच खोट्या बातम्या सोशल मीडियावरुन पसरवल्या जातात तो गंभीर गुन्हा आहे. त्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे याबाबतही चर्चा आणि निर्णय झाला आहे. लोकांना आमची विनंती आहे की सैन्य दलांकडून, तट रक्षक दलांकडून जी काही तयारी केली जाते आहे त्याचं चित्रीकरण करुन, व्हिडीओ काढून प्रसारित करु नये. सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे, त्याबाबतही चर्चा झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच प्रशासनासह नागरिकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये, “प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा. ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा. ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा. केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या,” अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
Happening now :
CM Devendra Fadnavis chairs a meeting at his official residence ‘Varsha’ in Mumbai, on ‘Security measures’ in the wake of current situation, with the DGP, top Home Dept officials and other senior officers of various agencies and departments.
DCM Eknath Shinde too… pic.twitter.com/SjybjaMTS9— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 9, 2025
त्याचबरोबर सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर देखील राज्य सरकार करडी नजर ठेवून असणार आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, “प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा. पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिंग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा. सैन्याच्या तयारी संबंधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा. सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या. नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.” असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट घ्या जाणून
प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा. एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ब्लॅकआऊटा बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या. शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडूनन्विरित सायबर ऑडिट करून घ्या. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.