Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करा; आमदार कराड यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी

लातूर जिल्‍हयात गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसानीत आलेल्या खरीप हंगामातील पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्‍या नेतृत्‍वातील शिष्‍ठमंडळाने केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 28, 2022 | 02:27 PM
नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करा; आमदार कराड यांची मुख्‍यमंत्र्यांकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

लातूर : लातूर जिल्‍हयात गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसानीत आलेल्या खरीप हंगामातील पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्‍या नेतृत्‍वातील शिष्‍ठमंडळाने केली आहे.

लातूर जिल्हयात यावर्षी समाधानकारक पाऊस होत असून खरीपाच्या पीकांची उगवण चांगली झाली आहे. मात्र डोलाने आलेल्‍या पीकांवर गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्‍यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. गोगलगाय ही एक बहुभक्षी किड आहे पिकांचे रात्रीच्‍या वेळी सक्रीय राहून मोठया प्रमाणात नुकसान करते, या गोगलगायीमुळे सोयाबीनसह खरीपाच्यां इतरही पीकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे असे निवेदनात नमूद केले आहे.

गोगलगायीचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हाभरात अनेक ठिकाणी गोगलगायीने सोयाबीनसह इतर पीकेही नष्ट केली आहेत. त्या‍चबरोबर सततच्या पावसामूळे पीके पिवळी पडत असून पीकांची वाढ खुंटली आहे, गोगलगायीचा प्रादुर्भाव आणि सततच्‍या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून सकंटात आलेल्‍या शेतकऱ्यांना दुबार पेरणीची आर्थिक झळ सहन होणारी नाही. त्यामुळे सोयाबीनसह खरीपाच्या पीकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी आणि दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्‍या नेतृत्‍वाखाली मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे भेटलेल्‍या शिष्‍ठमंडळाने एका निवेदनाद्वारे केली आहे.

[read_also content=”दौंडच्या पूर्व भागात बाजरी पीक जोमात ; मक्याचा खर्च परवडत नाही https://www.navarashtra.com/maharashtra/bajri-crop-flourishes-in-eastern-part-of-daund-cant-afford-the-cost-of-maize-nrab-309034.html”]

दरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांच्‍या नेतृत्‍वाखाली भेटलेल्‍या या शिष्‍ठमंडळात औसा विधानसभेचे आमदार अभिमन्‍यू पवार, भाजपाचे प्रदेश उपाध्‍यक्ष विनायकराव पाटील, जिल्‍हा सरचिटणीस विक्रम शिंदे, प्रदेश पदाधिकारी अमोल पाटील यांच्‍यासह अनेकजण होते.

Web Title: Make a summary panchnama of damaged crops mla karads demand to the chief minister nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2022 | 02:27 PM

Topics:  

  • Chief Minister Eknath Shinde
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • NAVARASHTRA
  • ramesh karad

संबंधित बातम्या

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज
1

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
2

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
3

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण
4

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.