Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“उष्माघाताने बळी गेला तर मुख्यमंत्री जबाबदार…”, मराठा आरक्षणावरून जरांगेंचा सरकारवर घणाघात; 30 तारखेपासून आंदोलनाचा इशारा

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत वेळकाढूपणाचा ठपका ठेवला आहे. मराठा समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी 30 तारखेपासून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 28, 2026 | 12:22 PM
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:
  • “उष्माघाताने बळी गेला तर मुख्यमंत्री जबाबदार…”,
  • मराठा आरक्षणावरून जरांगेंचा सरकारवर घणाघात
  • 30 तारखेपासून आंदोलनाचा इशारा
Manoj Jarange Patil on Maratha Reservation News : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (28 मे 2026) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे सांगताना त्यांनी सरकारला इशारा दिला. मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास 30 तारखेपासून पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधत आरक्षणाच्या मुद्द्यावर वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप केला आहे.

दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचा साताऱ्यात एल्गार; मोती चौकात घोषणाबाजी, अनेक मुद्द्यांवर सरकारला धरले धारेवर

सरकार जाणूनबुजून मराठा समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मराठे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे कारण पुढे करून समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने या विषयावर तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने आगामी काळात या मुद्द्यावर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकार जबाबदार राहील…

या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सांगितले की, तीन वर्षांपासून आंदोलन सुरू असताना सरकार चर्चेसाठी सतत वेळ मागत आहे. आता थांबता येणार नाही. उष्माघाताने बळी गेला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सरकार जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजातील मुलांचा उन्हाळा करून टाकल्यामुळे आता माघार घेण्याचे प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून सातारा गॅझेटचा निर्णय अद्याप झालेला नाही. एका महिन्याच्या मुदतीत माहिती देण्याचे आश्वासन दिले होते, तरी दहा महिने उलटले तरी काहीच झाले नाही. गुन्हे दाखल करून आंदोलकांवर दबाव टाकला जातो, पण गुन्हे मागे घेतले जात नाहीत. मराठा-कुणबी एकच आहेत, असे वारंवार सांगितले जाते, तरीही एकत्रित जीआर काढला जात नाही. मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करण्यासाठी किती वेळ लागणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

१९६७ पासून अन्याय

१९६७ पासून सरकारने मराठा समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप जरांगे यांनी केला. समाजाचे नुकसान कोण भरून काढणार, असा सवाल करत त्यांनी आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने, कायदेशीर लढाई सर्व काही केल्याचे सांगितले. तरीही आरक्षण मिळाले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाची गरज असते का, असा खडा सवालही त्यांनी केला.

महाबळेश्वर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश पल्लोड यांची निवड

Web Title: Manoj jarange criticizes government over maratha reservation protest warning from 30th may 2026 news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार
2

Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार

परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; घोषणा ऐकताच काय म्हणाले उपमुख्यमंत्री?
3

परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; घोषणा ऐकताच काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, फडणवीस, शिंदेंना दिला इशारा; नेमकं काय घडलं?
4

अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, फडणवीस, शिंदेंना दिला इशारा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.