Maharashtra Breaking News
Marathi Breaking news live updates- आज आपल्या देशासाठी अत्यंत खास दिवस आहे. २६ नोव्हेंबर जो भारतीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला गेला होता. कारण आजच्या दिवशी १९४९ मध्ये आपल्या स्वंतत्र देशाच्या संविधान औपचारिकरित्या स्वीकारण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. हे संविधान पूर्ण होण्यासाठी २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालवधी गेला होता. २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये आपल्या भारताचे संविधान अधिकृतपणे स्वीकरले गेले होते, पण २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान लागू करण्यात आले, ज्यामुळे आपला देश प्रजासत्ताक बनला. पण याचे महत्त्व पटवून देण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२५ मध्ये पहिला संविधान दिन साजरा करण्यात आला.






