Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक ऑक्टोबर २०२५ रोजी तासगाव तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 30, 2025 | 04:35 PM
शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?

शेतकऱ्यांच्या नुकसानीवरुन रोहित पाटील आक्रमक, उद्या तासगावात लाक्षणिक उपोषण; नेमकं काय आहेत मागण्या?

Follow Us
Close
Follow Us:

तासगाव/प्रवीण शिंदे : तासगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. हातातोंडाशी आलेला हंगाम पाण्याखाली गेला आहे, अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत अधिक खोल गेले, तर काहींच्या डोळ्यासमोर वर्षभराची मेहनत पाण्यात वाहून गेली. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे, या मागणीसाठी आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक ऑक्टोबर २०२५ रोजी तासगाव तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण होणार आहे.

शेतकरी हवालदिल, शासन मात्र मौन

तासगाव तालुक्यातील बहुतांश गावांमधील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. खरीप पिकांची अवस्था बिकट असून, शेतकऱ्यांवर जगण्याचे संकट ओढवले आहे. अशा वेळी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, आजवर केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीच घडलेले नाही. शासन यंत्रणा पंचनाम्यांच्या नावाखाली वेळ मारून नेत आहे, तर मदतीचा प्रश्न अजूनही हवेतच आहे.

उपोषणातील ठोस मागण्या

आमदार पाटील यांनी शासनासमोर काही ठोस मागण्या ठेवत या उपोषणाची दिशा स्पष्ट केली आहे.

  • अतिवृष्टी झालेल्या सर्व भागांमध्ये सरसकट पंचनामे व्हावेत.
  • शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
  • तालुक्यातील परिस्थितीला अनुसरून ओला दुष्काळ जाहीर व्हावा.
  • नुकसानभरपाईची अनुदान रक्कम वाढवून तातडीने द्यावी.
  • शेतकऱ्यांची बँक वसुली व कर वसुली थांबवावी.
  • सर्वसामान्य जनतेस निराधार पेन्शनची थकलेली रक्कम त्वरित मिळावी.
  • थांबवलेली रोजगार हमी योजना पूर्ववत सुरु करावी.

आजचा शेतकरी फक्त उत्पादन करत नाही, तर आपल्या रक्ताने आणि घामाने संपूर्ण अर्थव्यवस्थेला आधार देतो. तरीसुद्धा संकटाच्या काळात त्याच्याकडे मदतीसाठी बोट दाखवणारे हात दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणं हे शासनाचं कर्तव्य आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की शेतकरी आंदोलनाशिवाय सरकार हलत नाही.

तासगाव तहसीलसमोर होणारे हे उपोषण हा केवळ एक राजकीय उपक्रम नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. शासनाने जर अजूनही दुर्लक्ष केले, तर शेतकऱ्यांच्या असंतोषाची ठिणगी मोठ्या आंदोलनात परिवर्तित होईल, यात शंका नाही.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा इशारा

Web Title: Mla rohit patil to go on symbolic fast over farmers issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Rohit Patil

संबंधित बातम्या

‘शेतकऱ्यांच्या अश्रूंवर सरकारचे राजकारण’ तासगावातून रोहित पाटीलांचा थेट हल्लाबोल
1

‘शेतकऱ्यांच्या अश्रूंवर सरकारचे राजकारण’ तासगावातून रोहित पाटीलांचा थेट हल्लाबोल

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर
2

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच
3

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
4

पोलीस दलात खळबळ ! कोल्हापूरच्या सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.