Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांचे हाल, संजय केळकरांनी अधिकाऱ्यांना दिली ‘ही’ महत्वाची सूचना

ठाण्यात पाण्याची कमतरतेमुळे नागरिकांचे हाल होत आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी जनसेवकाचा जनसंवाद' या उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 09, 2025 | 07:42 PM
ठाण्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांचे हाल, संजय केळकरांनी अधिकाऱ्यांना दिली 'ही' महत्वाची सूचना

ठाण्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांचे हाल, संजय केळकरांनी अधिकाऱ्यांना दिली 'ही' महत्वाची सूचना

Follow Us
Close
Follow Us:

आधीच पाण्याची कमतरता असताना नियोजनाअभावी पाण्याचे समतोल वाटप होत नसल्याने अनेक भागात नागरिकांचे हाल होत आहेत. आठवडाभरात नियोजनबद्ध पाणीवाटप करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना आमदार संजय केळकर यांनी उपस्थित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या उपक्रमात केल्या.

भाजपच्या खोपट येथील पक्ष कार्यालयात आयोजित उपक्रमात आमदार संजय केळकर यांनी पाण्याच्या तक्रारी सोडवण्यासाठी नागरिक आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी विष्णू नगर, चरई आणि धर्मवीरनगर भागातील अनेक इमारतींचे प्रतिनिधी, माजी नगरसेवक सुनेश जोशी तर ठाणे महानगरपालिकाचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कुलकर्णी, भुवड, पांडे, भाजपाचे राजेश गाडे, सुरज दळवी, सचिन पाटील, ओमकार चव्हाण उपस्थित होते.

आधीच पाण्याची कमतरता असताना पाणी वाटपाच्या योग्य नियोजनाअभावी अनेक भागात पाणी टंचाई भेडसावत आहे. ज्या भागात पुरेसे पाणी मिळत होते, तेथे आता पाणी कमी मिळू लागले आहे. तर जेथे कमी पाणी मिळत होते तेथे पाण्याचे टँकरही वेळेवर येत नसल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. अनेक भागात पाण्याची पळवापळवी होत असून पाणी वाटपात अन्याय केला जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

कोणत्या राज्यात EV खरेदीवर मिळतेय सर्वाधिक सूट? महाराष्ट्रात ‘या’ बाबतीत 100 टक्के सूट

या आठवड्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे, आवश्यक उपाययोजना करून कोणत्याही विभागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. या आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुढील भूमिका ठरवू असेही केळकर यांनी सांगितले.

या उपक्रमात न्याय मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार केला. केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनातील वाहनचालकांना लिपीक पदावर बढती देण्यात आली. प्रसाविकांच्या अनियमित आणि अन्यायकारक बदल्यांना स्थगिती मिळवून देण्यात आली तर सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यात आला. या सर्व कर्मचाऱ्यांनी आज जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा हृदय सत्कार केला.

18 कॅरेट सोन्याने मढवलेल्या ‘या’ कारचा विषयच हार्ड! James Bond च्या चित्रपटाशी आहे खास कनेक्शन

पुनमिया कुटुंबियांच्या स्मरणार्थ जितेंद्र जैन या कुटुंबियांनी ‘संजय फाऊंडेशन’ या संस्थेला दोन तीनचाकी स्कूटर देण्यात आल्या.संजय फाऊंडेशन ही संस्था संपूर्ण कोकण विभागात कार्यरत असून काम नसलेल्या हाताला काम आणि आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदत करत असते. मानवसेवा हिच ईश्वरसेवा या भावनेने गेली अनेक वर्षे ही संस्था लोकांच्या सहकार्याने काम करत असल्याची माहिती केळकर यांनी दिली.

Web Title: Mla sanjay kelkar instructed water supply department officials on thane water issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 07:42 PM

Topics:  

  • Marathi News
  • Thane news
  • water issues

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.