Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणकोली पूलाच्या प्रवासात श्रेयवादाचा खोडा, मनसे आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना ट्वीट

मनसे आमदार यांनी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही हेच ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटची दखल घेऊन मुख्यमत्र्यांकडून आतातरी या पूलाचे लोकार्पण होणार की नाही याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 29, 2024 | 05:32 PM
माणकोली पूलाच्या प्रवासात श्रेयवादाचा खोडा, मनसे आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना ट्वीट
Follow Us
Close
Follow Us:

डोंबिवली-अमजद खान : डोंबिवली आणि ठाण्याला जोडणारा मोठा गाव माणकोली खाडी पूल तयार करण्यात आला आहे. मात्र श्रेयवादामुळे हा पूल जनतेच्या प्रवासाकरीता खुला केला जात नाही. जनतेच्या प्रवासात श्रेयवादाचा खोडा असल्याचे ट्वीट मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले आहे. मनसे आमदार यांनी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही हेच ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटची दखल घेऊन मुख्यमत्र्यांकडून आतातरी या पूलाचे लोकार्पण होणार की नाही याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

मोठा गाव माणकोली खाडी पूल हा डोंबिवली आणि ठाणे शहरांना जोडणारा आहे. अवघ्या १५ मिनिटात डोंबिवतीलून ठाणे गाठता येणार आहे. या पूलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या पूलाचे लोकार्पण केले जात नाही. या पूलाच्या लाोकार्पणकरता शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा आहे. दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. त्यांच्याकडून श्रेयवादासाठी पूलाचे लोकार्पण रखडवून ठेवण्यात आल्याचा स्पष्ट आरोपच मनसे आमदार पाटील यांनी ट्वीटद्वारे केला आहे. मनसे आमदार पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पूल जनतेसाठी बांधला होता की, श्रेयासाठी? असा सवाल उपस्थित केला आहे. माणकोली पूलाचे श्रेय बळकावण्यासाठी दोन्ही सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार होड सुरु आहे.

राज साहेब म्हणतात तेच खरं आहे. जनतेला राग येत नाही. म्हणून हे सत्ताधारी जनतेला वेठीस धरतात. शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमत्री आणि अन्य मंत्री डोंबिवलीत येणार आहेत. तर पूल नागरीकांना खुला करुन जनतेची ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका तरी करा. ज्यांना श्रेय घ्यायचे आहे. त्यांनी घेऊन टाका आणि कृपया आता तरी जनतेला गृहित धरणं सोडा असा टोला पाटील यांनी लगावला आहे. पाटील यांनी केलेल्या ट्वीटमुळे पूलाचे रखडलेले लोकार्पण होणार का तसेच शासन आपल्या दारी या कार्यक्रमास मुख्यमंत्री आल्यावर ते याविषयी काय बोलतात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Mns mla raju patils tweet to the chief minister a prank of credibility in mankoli bridge travel maharashtra political party maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 05:32 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • kalyan
  • Maharashtra Government
  • MNS MLA Raju Patil
  • thane

संबंधित बातम्या

Mira Bhayander : निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम; पोलीस भरती उमेदवारांची परवड
1

Mira Bhayander : निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम; पोलीस भरती उमेदवारांची परवड

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप
2

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव
3

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

70 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मिळणार 10 लाखांपर्यंत उपचार; ‘आयुष्मान वय वंदना’ योजना ठरतीये फायद्याची…
4

70 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मिळणार 10 लाखांपर्यंत उपचार; ‘आयुष्मान वय वंदना’ योजना ठरतीये फायद्याची…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.