Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, अपघातात एकाच मृत्यू तर ३७ जखमी पैकी ८ गंभीर

पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समयसुचकतेमुळे जखमींना योग्य वेळेत रूग्णालयात दाखल करणे सोयीचे झाले

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 17, 2023 | 11:12 AM
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, अपघातात एकाच मृत्यू तर ३७ जखमी पैकी ८ गंभीर
Follow Us
Close
Follow Us:

माणगाव : गणेशोत्सवासाठी चाकरमानी भक्तांना कोकणात घेऊन जाणाऱ्या एस टी बसला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर बस मधील ३७ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ८ जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्यांच्यावरती माणगाव, पनवेल व मुंबई येथील रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा अपघात माणगाव तालुक्‍यातील रेपोली गावा जवळ पहाटे ४.३० च्या सुमारास घडला.

रत्नागिरीतील राजापूर येथे गणेशोत्सवासाठी स्पेशल एस टी बस मुंबई येथून सोडण्यात आली होती. एकूण ३८ प्रवासी या बस मधून प्रवास करत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून रेपोली गावाजवळ आली पुढे असणाऱ्या ट्रेलर वरती आपटली ही धडक इतकी भयानक होती की बसची डाव्या बाजूचा भाग चक्काचूर झाला आहे. बस मधील सर्वच प्रवाशांना किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. एकाला उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला तर ८ जणांना अधिक उपचाराची गरज असल्यामुळे पनवेल व मुंबई येथील रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त समजताच महामार्गावर पेट्रोलिंग करणारे पोलीस, माणगाव डि वाय एस पी गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण नावले व अन्य कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समयसुचकतेमुळे जखमींना योग्य वेळेत रूग्णालयात दाखल करणे सोयीचे झाले या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली असतानाही मोठ मोठे कंटेनर व अवजड वाहने बिनदिक्कत पणे महामार्गावर चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी अवघ्या एका दिवसांत रायगड पोलीसांनी १०७ तर आर टी ओ विभागाने २७ जणांवर कारवाई केली आहे. रेपोली येथे बसच्या झालेल्या अपघाताच्या वेळी देखील कंटेनर जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहतूक बंदी असतानाही हा कंटेनर मुंबई कडून गोवा कडे चालला असताना बस त्यावरती पाठीमागून आदळली.

Web Title: Mumbai goa national highway mangaon panvel mumbai maharashtra government ratnagiri rajapur ganeshotsav government of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2023 | 11:12 AM

Topics:  

  • Ganeshotsav
  • Government of India
  • india
  • Maharashtra Government
  • Mangaon
  • Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.