
वांद्रे गरीब नगर झोपडपट्टीवर कारवाईवेळी तणाव; पोलिसांवर पाणी-बादल्या फेकल्यानंतर लाठीचार्ज
याचदरम्यान, मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेदरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई सुरू असताना, काही लोकांनी विरोध करत पोलिसांवर बाटल्या फेकल्या, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले. अतिक्रमण हटवण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहे.
मुंबईच्या वांद्रे परिसरात रेल्वेच्या जमिनीवर आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू आहे. ही मोहीम रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. काही दिवसांपूर्वी, एका परदेशी ब्लॉगरने वांद्रे रेल्वे मार्गालगतच्या झोपडपट्ट्या आणि अतिक्रमणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली. हा मुद्दा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली.
वांद्रे रेल्वे स्थानकातील सुमारे ५,००० चौरस मीटर जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती, परंतु बाधित रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने या कारवाईला स्थगिती मिळाली. राजकीय पाठिंब्याच्या आरोपांमुळे या मोहिमेला खीळ बसली होती, पण आता रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर कारवाई सुरू केली आहे.
ही मोहीम २३ मे पर्यंत सुरू राहणार असून मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, या पाच दिवसीय मोहिमेचा उद्देश ५,३०० चौरस मीटर रेल्वे जमीन मोकळी करणे आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा आहे. ही मोहीम २३ मे पर्यंत सुरू राहील. तसेच मुंबईतील सर्वात मोठ्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेल्या वांद्रे टर्मिनस येथे रेल्वेने उन्नत रस्ता, बहुमजली इमारती, प्लॅटफॉर्म आणि देखभाल सुविधा यांचा समावेश असलेले एक एकात्मिक संकुल उभारण्याची योजना आखली आहे.
अधिकाऱ्याने सांगितले, “गरीब नगरमधील रेल्वेच्या जमिनीवर बांधलेल्या ५०० झोपड्यांपैकी, आम्ही अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सुमारे १५ ते १८ टक्के झोपड्या हटवल्या आहेत.” कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, ही मोहीम नागरी प्रशासन, पोलीस अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ही मोहीम मानवतावादी पद्धतीने राबवण्यासाठी, ही मोहीम नागरी प्रशासन, पोलीस अधिकारी आणि रेल्वे सुरक्षा यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे.