Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News : धान उत्पादकांवर पुन्हा संकट; नेमकं कारण घडलं?

पचखेडी परिसरातील अनेक शेतकरी मोटार पंपाच्या मदतीने शेताला पाणी देतात. मात्र, दिवसा वीज उपलब्ध असली तरी ती वारंवार खंडित होत असल्याने सिंचनाचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 14, 2026 | 05:47 PM
Maharashtra News : धान उत्पादकांवर पुन्हा संकट; नेमकं कारण घडलं?
Follow Us
Follow Us:

पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. हवामान विभागाने पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज दिल्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहेत. ज्यांच्याकडे विहीर किंवा बोअरवेलची सुविधा आहे, त्यांनी धानाची रोपे वेळेत तयार केली. आता ही रोपे शेतात लावण्याची वेळ आली असतानाच विजेच्या अडथळ्यामुळे शेतीची कामे रखडत आहेत.

पचखेडी परिसरातील अनेक शेतकरी मोटार पंपाच्या मदतीने शेताला पाणी देतात. मात्र, दिवसा वीज उपलब्ध असली तरी ती वारंवार खंडित होत असल्याने सिंचनाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. काही वेळा वीज गेल्यानंतर अर्धा तास ते एक तास पुरवठाच होत नाही. त्यामुळे मोटार बंद पडते आणि शेतातील काम थांबते. धानाची रोपे जास्त दिवस पाण्याविना ठेवली तर त्यांची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे वेळेत रोवणी न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आधीच पावसाने साथ सोडली आहे, त्यात विजेची समस्या वाढल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

Mira Bhayandar News : कोट्यवधींच्या निविदा, तरी उघडी चेंबर्स कायम! म्हशीच्या घटनेनंतर मिरा-भाईंदर मनपा पुन्हा वादात

शासनाकडून शेतीसाठी नियमित वीज पुरवठ्याची घोषणा केली जाते. मात्र, प्रत्यक्षात वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे शेतकऱ्यांना त्याचा अपेक्षित फायदा मिळत नाही. दिवसभर विजेचा असा लपंडाव सुरू राहणार असेल, तर रात्रीच्या लोडशेडिंगमध्ये काही प्रमाणात सवलत देऊन अतिरिक्त वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पाणी असूनही वीज नसल्यामुळे पिके वाचवणे कठीण होत आहे. रोवणीचा हंगाम हातातून गेला तर संपूर्ण वर्षाचे गणित बिघडू शकते. त्यामुळे महावितरणने तातडीने या समस्येची दखल घेऊन अखंडित वीज पुरवठा सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या शेतीतील प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. अशा वेळी पाऊस आणि वीज या दोन्ही गोष्टींची साथ मिळाली तरच शेतकऱ्यांचे कष्ट फळाला येतील. अन्यथा यंदाचा हंगाम अनेकांसाठी आर्थिक अडचणी वाढवणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजारासह अनेक महत्त्वाच्या घोषणांना मंजुरी

 

Web Title: Erratic power supply delays paddy transplantation amid dry spell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • electricity
  • maharashtra
  • mahavitaran
  • Mahavitaran Department

संबंधित बातम्या

Dharashiv News : पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांचा मोठा विजय; विमा कंपनीचे अपील फेटाळले, 7 दिवसांत भरपाईचे आदेश
1

Dharashiv News : पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांचा मोठा विजय; विमा कंपनीचे अपील फेटाळले, 7 दिवसांत भरपाईचे आदेश

Pratap Sarnaik : महिला ई-रिक्षा योजनेसाठी सरकारचा मोठा निर्णय; अनुदान 40% पर्यंत, बॅटरी तंत्रज्ञान सुधारण्यावर भर
2

Pratap Sarnaik : महिला ई-रिक्षा योजनेसाठी सरकारचा मोठा निर्णय; अनुदान 40% पर्यंत, बॅटरी तंत्रज्ञान सुधारण्यावर भर

FDA Action on Blood Banks: राज्यातील ३८ ब्लड बँकांवर एफडीएची मोठी कारवाई! ३४ चे परवाने निलंबित, ४ रक्तपेढ्यांचे परवाने कायमचे रद्द
3

FDA Action on Blood Banks: राज्यातील ३८ ब्लड बँकांवर एफडीएची मोठी कारवाई! ३४ चे परवाने निलंबित, ४ रक्तपेढ्यांचे परवाने कायमचे रद्द

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजारासह अनेक महत्त्वाच्या घोषणांना मंजुरी
4

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजारासह अनेक महत्त्वाच्या घोषणांना मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.