
Nanded Municipal Corporation to hold first meeting on March 16 to decide on standing committee
Nanded News : नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त मिळाला आहेे. येत्या सोमवारी म्हणजे दि.१६ मार्च रोजी महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सभेस सुरूवात होणार आहे. या सभेच्या विषयपत्रिकेवर केवळ चार विषय ठेवण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या १६ तर महिला बालकल्याण समितीच्या ११ सददस्यांची निवड या सभेत केली जाणार आहे. तौलनिक संख्याबळानुसार भाजप, शिवसेना महायुतीचे १० सदस्य निवडले जाणार असून काँग्रेस वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचे प्रत्येकी ३ सदस्य राहणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट व अपक्ष नगरसेवकास स्थायी समितीत संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिला सभेत स्व. अटलजींचे स्मरण, पुर्णाकृती पुतळा उभारला जाणार
भाजपाने निवडणुकीच्या संकल्पनाम्यात स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुणर्णाकृती पुतळा उभारण्याचे जाहीर केले आहे, त्या अनुषंगाने वचनपूर्तीच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याचे काम भाजपाने केले आहे. स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्याचा ठराव मनपाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत घेण्यात येत असून माजी सभापती किशोर स्वामी, उपमहापौर दिपकसिंह रावत, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे हे या ठरावाचे सूचक आहेत, तर नगरसेविका शांभवी साले, विरेंद्रसिंघ गाडीवाले हे अनुमोदक आहेत. संकल्पपूर्तीच्या दिशेने भाजपने पहिले पाऊल टाकले आहे.
हे देखील वाचा : TETमध्ये इंग्रजी सक्तीची करा! मराठी माध्यमातील शिक्षकांसाठी पळवाटा रोखण्यासाठी परिपत्रक
महिला बालकल्याण समितीत ११ सदस्य
महिला व बालकल्याण तसेच शिक्षण समितीत भाजप, शिवसेना युतीचे सात तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व एमआयएमचे प्रत्येकी २ सदस्य निवडले जाणार आहेत. स्थायी समितीवर तसेच महिला व बालकल्याण समितीवर कोणत्या सदस्यांची वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गटनेत्यांकडून नावांची यादी महापौरांकडे सुपूर्द केली जाणार असून त्यानंतर महापौरांकडून सदस्यांची नावांची घोषणा केली जाणार आहे.
हे देखील वाचा : नागरिकांनो.. गोडधोड पदार्थ सुरक्षित आहेत काय? सणाच्या मुहूर्तावर भेसळयुक्त मिठाईचा सुळसुळाट
‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा
नांदेड-लातूर थेट रेल्वे जोडणारा प्रकल्प नसून, ही विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तिन्ही विभागांना रेल्वे मार्गे जवळच्या अंतराने जोडणारी एक महत्त्वाची ‘मिसिंग लिंक’ असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी देण्याची मागणी आज राज्यसभेत मांडताना ते बोलत होते. शून्य प्रहरात काळात हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, नांदेड आणि लातूर ही मराठवाड्यातील कृषी व व्यापाराची मोठी केंद्रे आहेत. मात्र, या
नांदेड-लातूर रेल्वे प्रकल्पाबाबत खा. चव्हाण आग्रही दोन शहरांत अद्याप थेट रेल्वे मार्ग नाही. सध्या रेल्वेने २१२ किमीचा वळसा घालून जाण्यासाठी ६ तास लागतात, तर रस्ते मार्ग १४४ किमीचा आहे. प्रस्तावित १०४ किमीच्या नवीन थेट रेल्वे मार्गामुळे हा प्रवास अवघ्या सव्वा तासात पूर्ण होणे शक्य आहे. ही मिसिंग लिंक पूर्ण झाल्यास विदर्भातील नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रात मिरज या दोन मोठ्या रेल्वे जंक्शनमधील अंतर ९९१ किमीवरून ८०७ किमीवर येईल. म्हणजेच सुमारे १८४ किमीचे अंतर कमी होईल, याचा थेट फायदा विदर्भ आणि शेजारील छत्तीसगड, मध्यप्रदेशातील बिलासपूर व जबलपूर सारख्या शहरांना पश्चिम किनारपट्टीकडे जाण्यासाठी होईल, असे खासदार अशोक चव्हाण म्हणाले आहेत.