
DCM Eknath Shinde Attends Farmers' Rally Organized by Former MLA Shankarrao Dhondge Nanded News
Nanded Political News : लोहा : आजचा दिवस शिवसेनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा असून शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारे कार्यकर्ते म्हणजे शंकरअण्णा धोंडगे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात केले. लोहा येथील बैल बाजार मैदानावर माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या पुढाकारातून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार ज्योती वाघमारे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी मंत्री सिद्धराम मेह्त्रे, आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंदराव बोंढारकर, बाबुराव कदम कोहळीकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, दत्ता पवार, शिवराज बोंडगे, दिलीप धोंडगे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (Political News)
अण्णांनी शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास ठेवला
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “शंकरअण्णा धोंडगे यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असून अनेक माजी सैनिकांचाही सहभाग आहे. “जय जवान, जय किसान” असा हा संगम असल्याचे त्यांनी सांगितले. शंकरअण्णा यांनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास ठेवला, हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे देखील वाचा : काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; एअरबॅग उघडल्या नाहीच अन्..
शेतकऱ्यांच्या पाठीशी
शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे काम सरकारने केले असून मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारचे सहा हजार रूपये व राज्य सरकारचे सहा हजार रूपये असे बारा हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. शेतकरी हा राज्याचा अन्नदाता असून राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली. काहींना शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याचे पटले नाही, मात्र सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले,. शंकरअण्णा हे महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकऱ्यांचे नेते झाले असून अण्णांचा शिवसेना प्रवेश राजकारणाला कलाटणी देणारा ठरला आहे. असेही शिंदे यावेळी म्हणाले.
हे देखील वाचा : पार्थ पवार अन् राज ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास चर्चा, कारण मात्र गुलदस्त्यात
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिवसेना कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांनी केले. संध्याताई फाऊंडेशनतर्फे जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त गोकुळ लॉन्स, नांदेड येथे आयोजित ‘नवरत्न महिला सन्मान’ पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करत महिलांना आर्थिक बळ देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले. तसेच आ. बालाजी कल्याणकर व त्यांच्च्या पत्नी संध्याताई कल्याणकर यांनी बचतगटाच्या माध्यमातून २१ हजार महिलांना स्वावलंबी केले, हे देखील त्यांनी सांगितले आहे.