
"विकासाच्या नावे सुरू असलेला विनाश थांबवा", ऑक्सिजन मास्क घालून Gen Z उतरले शहराच्या रस्त्यावर (फोटो सौजन्य-Gemini)
उन्हाचा वाढतोय तडाखा; पाणी टंचाई तीव्र, नाशिकमध्ये 162 गावांना टँकरने पाणी
मनपाकडून विकास आणि कुंभाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर जिवंत वृक्षांची तोड करण्यात येत आहे. ही प्रवृत्ती शहराच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणारी असल्याची टिकाही यावेळी करण्यात आली, नागरिकापर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी १० एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत ५००० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.
या स्वाक्षऱ्या महापौर, मुख्यमंत्री, हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत, प्रशासनाने तात्काळ भूमिका बदलून नागरिकांना विश्वासात घ्यावे, अन्यथा संघर्ष तीव्र करण्याचा इशाराही ‘पीपल्स दी सिटीझन मुव्हमेंट ‘तर्फे देण्यात आला
आहे. यावेळी आनंद रॉय, मानसी सरदेसाई, अदिती पटेल, दीप्ती बर्वे, डॉ कविता देवरे, जिज्ञासा जाधव, मुक्ता कावळे, निकिता जांगिड, सौकिया, योगेश गोवर्धने, मोनल कानडे, तल्हा शेख, समर रॉय, अंकिता दीक्षित, राधा शेलार उपस्थित होते. या आंदोलनाला काँग्रेड राजू देसले, मनोहर पगारे, डॉ डी एल कराड, राहुल गायकवाड, प्रफुल वाघ, विक्की गायधनी, संविधान गायकवाड, सलीम मामा शेख, अंकुश पवार, मनीष बाविस्कर, भारती जाधव, राजेश पंडित, डॉ संदीप भानोसे, अथर्व बाजीराव आदी उपस्थित होते.
मोर्चानंतर प्रतिनिधी मंडळाने महापौरांना निषेदन देण्यासाठी प्रयत्न केला, मात्र महापौर अनुपस्थित होत्या, त्यानंतर उपमहापौर प्रतिनिधींशी चर्चा करतील, असे सांगण्यात आले, परंतु ३० ते ४० मिनिटे प्रतीक्षा करूनही कोणताही लोकप्रतिनिधी भेटीस आला नाही, या निषेधार्थ प्रतिनिधी मंडळाने कोणत्याही लोकप्रतिनिधींना न भेटण्याचा निर्णय घेतला आणि आपले निवेदन उपमहापौरांच्या पीए कडे सुपूर्द केले.
Nashik News: अंत्यसंस्कार ‘इव्हेंट’ नव्हे, परंपरेचा सन्मान: राजस्थानात तरुणांकडून जागृती