श्रावणी सोमवारच्या गर्दीचा वाहतुकीला फटका; खड्डे अन् अपघातांमुळे नाशिक-त्र्यंबक मार्ग ठप्प
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणासाठी हा रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून एका बाजूने खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सध्या एकाच बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी पर्यटकांसह भाविकांची अलोट गर्दी झाल्याने रस्त्यावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली. त्यातच गेल्या दोन दिवसांत पडलेल्या रिमझिम पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांमधून होणाऱ्या ऑईल गळतीमुळे हा मार्ग अधिकच निसरडा बनला आहे. (Nashik News Marathi)
सहा महिने उलटूनही रस्ते विकासाच्या कामात कोणतीही समाधानकारक प्रगती झालेली नाही. या विकेंडला झालेली दाणादाण पाहता, यंदाच्या संपूर्ण श्रावण महिन्यात त्र्यंबकराजाचे दर्शन घेणे भाविकांसाठी अत्यंत कठीण आणि त्रासदायक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करून रस्ता सुरळीत करावा, अशी तीव्र मागणी नाशिककर व भाविकांमधून केली जात आहे.
या निसरड्या रस्त्यामुळे गेल्या दोन दिवसांत किमान १०० हून अधिक दुचाकी घसरून लहान-मोठे अपघात घडले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी अनेक नागरिक व भाविक जखमी झाले आहेत. १०० हून अधिक दुचाकी या निसरड्या रस्त्यामुळे गेल्या दोन दिवसांत घसरून अपघात घडले आहेत.
श्रावणी सोमवार आणि विकेंडच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने खासगी वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील वाहनतळाची क्षमता अपुरी असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरून येणारी खासगी वाहने शहरात न नेता खंबाळे येथील बाह्य वाहनतळावर थांबविण्यात येणार आहेत. कार, टॅक्सी, रिक्षा तसेच इतर चारचाकी खासगी वाहनांनी त्र्यंबकेश्वर शहरात न जाता खंबाळे येथील बाह्य वाहनतळाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खंबाळे येथील बाह्य वाहनतळावर वाहने उभी केल्यानंतर भाविकांना त्र्यंबकेश्वर शहरात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. भाविकांच्या संख्येनुसार आवश्यकतेनुसार अतिरिक्त बससेवा वाढविण्यात येणार असून, खंबाळे ते त्र्यंबकेश्वर अशी पुढील वाहतूक एसटी बसद्वारे केली जाणार आहे. या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर शहरातील अरुंद रस्त्यांवरील खासगी वाहनांची गर्दी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
Nashik Scandal: तांत्रिक खरातने दिला नरबळी: सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाचा खळबळजनक संशय