
maharashtra (फोटो सौजन्य: social media)
Mumbai Accident: भीषण अपघात! मरीन ड्राईव्हवर दुचाकीने उडवले पादचारी; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शिवाजी कांबळे असे आहे. ते मूळचे जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील रहिवासी आहे. कामासाठी ते नाशिकला स्थायिक झाले होते. दोन दिवसांपूर्वीच ते आपल्या कुटुंबासह परभणीत विटभट्टीवर काम करणाऱ्या भावाकडे आले होते. 24 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास शिवाजी कांबळे आपली पत्नी मीनाक्षी, मुलगी विद्या आणि सासू यांच्यासह साडू विजय मस्के यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते. वाटेत जात असतांना त्यांना अचानक चक्कर आली. त्यांच्या मुलीने चक्कर आल्याचे पहिले मात्र त्यांनतर ते बेपत्ता झाले होते.
पालथ्या अवस्थेत आढळून आला
दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीने ही माहिती भाऊ महादेव कांबळे याना दिली. बराचवेळ त्यांचा शोध घेतला असता नांदखेडा रोडवरील एका खड्ड्यात शिवाजी यांचा मृतदेह पालथ्या अवस्थेत पडलेला आढळून आला. शिवाजी यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांचे शरीर कडक झाले होते आणि पाठ व हातावर तीव्र उन्हामुळे त्वचा करपल्याचे व्रण दिसत होते. त्यांच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले.
अकस्मात मृत्यूची नोंद
विटभट्टी मालक देशमुख यांच्या गाडीतून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर महादेव बबन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परभणी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण आहे. शिवाजी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून उन्हापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
Ashok Kharat case: अशोक खरातच्या जीवाला धोका! सरकारी वकिलांचा न्यायालयात दावा
Ans: शिवाजी बबन कांबळे (वय 37), मूळ जिंतूर तालुक्यातील.
Ans: उन्हामुळे चक्कर येऊन खड्ड्यात पडले व उष्माघाताने मृत्यू झाला.
Ans: परभणीतील नांदखेडा रोड परिसरात.