२० विद्यार्थ्यांना विषबाधा (फोटो- istockphoto)
दूषित पाणी पिल्यामुळे २० विद्यार्थ्यांना विषबाधा
विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले
विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण
पिंपरी: पिंपरी शहरातील एका शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात दूषित पाणी पिल्यामुळे २० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकृती बिघडल्याने सर्व विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गुरुवारी अचानक मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. काही विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नवीन भोसरी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी १० विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर उर्वरित १० विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार सुरू असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
किचनमध्ये लपला आहे धोका! दारुपेक्षा अधिक घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ; डॉक्टरांनी दिला इशारा
या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याचा वॉटर फिल्टर अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरून पाणी पिण्याची वेळ आली होती, असेही त्यांनी सांगितले.
शासनाकडून वसतिगृहांच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतानाही मूलभूत सुविधा योग्य प्रकारे उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शाळेतील मध्यान्ह भोजनातून तब्बल 12 विद्यार्थ्यांना विषबाधा; पालकांमध्ये तीव्र संताप
घातक आहेत स्वपयंपाकघरातील हे पदार्थ
साखर
चहापासून काॅफी आणि प्रत्येक गोड पदार्थामध्ये साखरेचा आवर्जून वापर केला जातो. परंतु याचे अतिरिक्त सेवन आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. डाॅक्टरांनी याला सायलंट किलर म्हटले आहे. साखर शरीरात सहज विरघळते आणि इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवते. ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आणि फॅटी लिव्हरचा धोका देखील वाढतो. अनेकांच्या आहारात साखरेचे दररोज सेवन केले जाते अशात तुम्ही आजपासूनच याचे सेवन कमी करायला हवे.
फक्त साखरंच नाही तर रोजच्या वापरात समाविष्ट होणारे असे अनेक पदार्थ आहेत ज्याच कोणतेही पौष्टिक मूल्य नसते आणि ते फक्त साखरेने भरलेले असतात. तुम्ही आजपासूनच यांचे सेवन कमी करायला हवे अन्यथा तुमच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा
टोमॅटो सॉस
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच टोमॅटो साॅसचे सेवन आवडते. भजी, पिझ्झा, बर्गर, पराठा यासोबत याचे सेवन केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? टोमॅटो साॅसमध्ये साखरेचा मोठा अंश आढळला जातो. अनेक सॉसवर “साखर नाही” असे लेबल लावले जाते, पण हे एक घोटाळा आहे. सर्व सॉसमध्ये साखर जास्त असते. जर तुम्ही एक चमचा सॉस खाल्ले तर समजून जा की, तुम्ही तुमच्या शरीराला एक चमचे साखर देत आहात.






