Pune Water Supply: पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट? खडकवासला प्रकल्पातील नियोजनात मोठा बदल
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार प्रमुख धरणांमधील पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे केले जात आहे. वाढती लोकसंख्या, तसेच स्थलांतरित नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील पिण्याच्या पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा योग्य वापर आणि दीर्घकालीन नियोजन आवश्यक बनले आहे.
Railway News : पुणे रेल्वे विभागाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका; सात हजारांहून अधिक प्रकरणे नोंद
पाटबंधारे विभागाचे अधिकारी फाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणातील पाण्याचे वाटप करताना ठराविक प्राधान्यक्रम पाळला जात आहे. यामध्ये सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात असून, त्यानंतर औद्योगिक वापर, शेतीसाठी पाणी आणि नदीचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी सोडले जाते. यामुळे मर्यादित साठ्याचा योग्य वापर होऊन संभाव्य टंचाई टाळण्याचा प्रयत्न आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांवरील अवलंबित्व लक्षात घेता, पावसाचे प्रमाण घटल्यास धरणसाठ्यावर थेट परिणाम होऊ शकतो आणि पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत धरणातील साठा अधिक काळ टिकवून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुणे शहरात नोकरी निमित्ताने किवा शिक्षण या साठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याबाहेरून, राज्याबाहेरुन लोकसंख्या आलेली आहे. धरणाची साठवणूक क्षमता तेवढीच आहे पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
८ घरणातील पाणी 31 ऑगस्ट पर्यंत पुरेल अशा अनुषंगाने अंमलबजावणी सुरू केली आहे. या बाबत कॅबिनेट मंत्र्यांनी सूचना केल्याप्रमाणे काम करत आहोत.
फाळके, अभियंता, पाटबंधारे विभाग पुणे
हवामानातील बदलांमुळे या वर्षी पाऊस कमी पडण्याची शकता वर्तवण्यात आली असल्यामुळे धरणात पाण्याची किती उपलब्धता राहील याबाबत शंका वर्तवण्यात आली आहे त्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता असणारी ऊसा सारखी पिके न घेता पीक पद्धतीत बदल करून कमी पाण्यावर येणारी पिके घेण्याचा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे.






