
भोर तालुक्यात कुटुंबे उघड्यावर; गारपीठ अन् वादळी पावसामुळे शेतीसह घरांचे अतोनात नुकसान
यात्रेनिमित्त उभारलेला मांडव उडून गेला
वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने व खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील वडगाव डाळ येथे ग्रामदेवता यात्रेनिमित्त उभारलेला मांडव उडून गेला. उज्वला विजय चव्हाण यांच्या घराचे छप्पर उडून सुरेश यदु गायकवाड यांच्या घरावर पडल्याने त्यांच्याही घराचे नुकसान झाले. त्यात ते जखमी झाले आहेत. इतर गावांत देखील घरांची पडझड झालेल्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
संसारोपयोगी वस्तू पावसात भिजल्या
अचानक ओढवलेल्या या संकटामुळे अनेकांचे धान्य, कपडे आणि संसारोपयोगी वस्तू पावसात भिजून खराब झाल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी शासनाकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. “आम्ही जगायचे कसे?”असा प्रश्न पीडित कुटुंबे उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्तांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.