
बारामतीच्या पाणी प्रश्नावर युगेंद्र पवारांची भूमिका स्पष्ट (Photo Credit- X)
युगेंद्र पवार यांनी सांगितले की, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना जानाई-शिरसाई योजनेचे पाणी सुटत नव्हते. यासाठी त्यांनी १६ एप्रिल रोजी पुणे सिंचन भवन येथे जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. सिंचन भवनच्या पाठपुराव्यामुळे २२ एप्रिलला शिरसाईचे तर २९ एप्रिलला जानाई योजनेचे पाणी सुटले आहे. आगामी काळात जानाई योजनेचे सर्व सहा पंप पूर्ण दाबाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि प्रथम पिण्याच्या पाण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
पूर्वी अजित पवार सोबत असताना प्रशासनावर त्यांचा वचक होता आणि कामे आपोआप मार्गी लागत होती. मात्र, आता ते सोबत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात पाणी वेळेवर मिळेल का, अशी भीती निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण मैदानात उतरल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. नीरा-कऱ्हा जोडो हा प्रकल्प अजित पवारांचे स्वप्न असून बारामतीकरांचीही तीच इच्छा आहे. मात्र, फडणवीसांनी अधिवेशनात उल्लेख करूनही निधी दिला नसल्याने त्यांनी शंका व्यक्त केली. जानाई बंद पाईपलाईनचे काम पुढील २-३ वर्षात सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युगेंद्र पवार यांची कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा; येत्या 2 दिवसांत…
पवार विरुद्ध पवार अशी लढत व्हायला नको हे म्हणणं आहे. याआधी मी देखील बोललो आहे, जय देखील बोलला आहे. काल सुप्रियाताईंचं वक्तव्य मी ऐकलं. सुनेत्रा काकी देखील बोलल्या आहेत. त्यामुळे आम्ही कुटुंब म्हणून एक असलं पाहिजे, पवार विरुद्ध पवार अशी लढाई व्हायला नाही पाहिजे, अशी भूमिका युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.
अजित पवारांच्या अपघातासंदर्भात आणि रोहित पवारांच्या आरोपांवर भाष्य करताना त्यांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली. “सीआयडी, डीजीसीए आणि सीबीआय तपास करत आहेत. प्राथमिक अहवालातील काही गोष्टी पटण्यासारख्या नाहीत, मात्र आपण तपासाला सहकार्य केले पाहिजे. चौकशी पारदर्शक असावी आणि लवकर सत्य बाहेर यावे, हीच आमची इच्छा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना त्यांनी सुनेत्रा पवारांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला. “दादांचे काम पाहून बारामतीकरांनी सुनेत्रा वहिनींना भरभरून मतदान केले आहे. २ लाख २४ हजार मतांपैकी किमान २ लाख २० हजार मते त्यांना मिळतील,” असा दावा त्यांनी केला.
बारामतीत वीजपुरवठ्यावरून युगेंद्र पवार आक्रमक; सायंकाळी फोर्स लोडशेडिंग थांबवण्याची मागणी