
पर्यटकांची वाढती गर्दी, पण सुविधा अपुऱ्या! नागाव समुद्र किनाऱ्यावर अंधार, स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर
Kajat News : नेरळ-कळंब रस्त्याचा वाद विकोपाला ; अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा
नागाव किनाऱ्याची स्वच्छ वाळू, विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि शांत वातावरण यामुळे हा किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. तालुक्यातील तसेच बाहेरील भागांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे येतात. किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी बंदर विभागाने उभारलेला धूपरोधक बंधारा हा किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरला असून, त्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत येथे आवश्यक सुविधा विकसित करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
संध्याकाळनंतर किनाऱ्यावर अंधाराचे साम्राज्य पसरते. हायमास दिवे बसवले असले तरी ते बहुतांश वेळा बंद असल्याने पर्यटकांना मार्ग शोधताना अडचणी येतात. विशेषतः कुटुंबासह येणा-या पर्यटकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. तसेच, समुद्रात भिजल्यानंतर अंघोळीसाठी स्वच्छ पाण्याची सोय नसल्याने पर्यटकांची गैरसोय होते. स्वच्छतागृहांची कमतरता, तसेच कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र जागेचा अभाव यामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागतो.
पर्यटनस्थळी या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत पर्यटक व्यक्त करत आहेत. याशिवाय, शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असतानाही सागर सुरक्षा रक्षकासाठी कायमस्वरूपी छावणी किंवा नियंत्रण कक्ष उपलब्ध नाही. संभाव्य अपधात किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर नागाव समुद्र किनाऱ्याचा सर्वांगीण विकास करणे अत्यंत गरजेचे आहे.
Karjat News : पळसदरीत भीषणअग्नीतांडव; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक तपास
नागाव समुद्र किनारा हा पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम पर्याय असल्याने आम्ही येथे नेहमीच येत असतो. मात्र येथील सूर्यास्तंनंतरचा अंधार अपघाताला कारण ठरणारा आहे. तर स्वच्छतागृहाभावी महिला आणि जेष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने या सुविधा देणे गरजेचे आहे.- रोहन ठाकूर, (पर्यटक, पनवेल)
उरणचा समुद्र किनारा उत्तम आहे. इथे आल्यावर मुलांना समुद्राच्या पाण्याचा आनंद घेता येतो. मात्र येथे कपडे बदलण्याची आणि स्वच्छ पाण्यात अंघोळ करण्याची व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. सुरक्षा रक्षकांचा देखील आभाव असल्याने, पर्यटकांवर कोणतेच अंकुश राहात नाही, ज्यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण होऊशकते.- सुनील भोसले, (पर्यटक, उलवे)