
Raigad News: उरण नगरपरिषद वार्ड ७ मधील स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था; अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
छत्रपती संभाजीनगरसाठी आनंदाची बातमी! नवीन पाणीपुरवठा योजनेची चाचणी यशस्वी; लवकरच शहराची तहान भागणार
उरण शहरातील वर्दळीच्या भागांपैकी एक असलेल्या वार्ड क्र. ७ मध्ये भाजी मार्केट, माशांचा बाजार, चिकन मटण दुकाने तसेच विविध किरकोळ व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. दररोज हजारो नागरिक या परिसरात ये-जा करत असतात. याशिवाय कोट गाव वसलेले असल्याने स्वच्छतागृहाची गरज आहे. येथे स्वच्छतागृह उभारले असले तरी त्याची नियमित स्वच्छता न केल्याने ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. स्वच्छतागृह परिसरात कचराकुंड्यांची दुरवस्था, पाण्याच्या टाक्यांची देखभाल नसणे तसेच सांडपाण्याचा निचरा न होणे या समस्या गंभीर बनल्या आहेत. गटारातील सांडपाणी साचून राहत असल्याने मच्छरांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. याशिवाय हजारोंच्या येथे सार्वजनिक संख्येने उंदीर व घुशी परिसरात वावरताना दिसत असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
दरम्यान, १७ एप्रिल रोजी झालेल्या उरण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत या स्वच्छतागृहाच्या दुरुस्ती, गटार सफाई, सांडपाणी निचरा आणि औषध फवारणीसंदर्भात ठराव मांडण्यात आला होता, मात्र नगरपरिषदेच्या निधीअभावाचे कारण देत विरोधकांनी हा ठराव नामंजूर केला. या निर्णयामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी विरोधी बाकावरील भाजप सदस्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडूनही या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे, औषध फवारणीसारख्या मूलभूत उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. तत्काळ उपाययोजना करून स्वच्छतागृह व परिसराची डागडुजी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
अनेक दुकानदार, मास विकत, ग्राहक, रिक्षाचालक यांचा वावर याठिकाणी असल्याने, या प्रत्येकाच्या आरोग्याचा प्रश्न या अनुषंगाने निर्माण होत आहे. यामुळे पुढील १५ दिवसांत येथील पारिस्थिती सुधारली नाही तर येथील कचरा नगरपरिषदेच्या कार्यालयात मी स्वतः नेऊन टाकेन. – नरेश रहाळकर, शिवसेना, उबाठा उपजिल्हाप्रमुख
एनए जमिनीची प्रक्रिया आता होणार आणखी सोपी; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
अनेक तक्रारी केल्या, थातूरमातूर काम केले जाते. कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, नगरपरिषदेमध्ये दोन-चार वेळा गेलो. अधिकाऱ्यांशी बोललो. ते नाही म्हणत नाहीत, पण काहीच काम करत नाहीत. किमान नागरिकांना स्वच्छतागृहात जाण्यासाठी स्वछता तरी हवी. आमच्याकडे येणारा ग्राहक अशा पारिस्थितीमध्ये स्वच्छतागृहाचा वापर करत नाही.- मनोज पाटील, दुकानदार
याठिकाणी कचरा, दुर्गंधी, तुंबालेली गटारे, अस्वच्छ स्वच्छतागृह अशा अनेक समस्या आहेत. यासाठी राजकारण बाजूला ठेऊन जनतेची कामे केली पाहिजेत. समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही सभागृहात प्रस्ताव मांडत आहोत पण समोरच्या बाजूने त्याला विरोध होत आहे. सुविधा देणे गरजेचे आहे, मात्र हे विरोधी बाकावरील सदस्यांना देखील समजले पाहिजे. – तनिषा पाटील, नगरसेविका