Raigad News: श्रीवर्धनमध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाला व्यापारी-नागरिकांचा तीव्र विरोध; १३ ऑगस्टच्या सभेपूर्वी आंदोलनाचा इशारा
Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !
मात्र बैठकीदरम्यान संबंधित नगरसेवकानीच “आम्हालाही या विषयाची कोणतीही अधिकृत माहिती नाही असे स्पष्ट केल्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त करण्यात आला. बाधित नागरिक आणि स्थानिक प्रतिनिधींना माहिती न देता एवढा महत्त्वाचा विषय अजेंड्यावर कसा आला?”, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. (फोटो सौजन्य – AI Created)
बैठकीत नागरिकांनी आठवण करून दिली की, निवडणुकीपूर्वी खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बाधित व्यावसायिक व नागरिकांची बैठक झाली होती. त्या वेळी रस्ता रुंदीकरणाऐवजी पर्यायी रस्ता विकसित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असा दावा बैठकीत करण्यात आला. त्यामुळे आता अचानक रस्ता रुंदीकरणाचा विषय पुन्हा पुढे येणे, तो सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर समाविष्ट होणे, आणि त्याबाबत स्थानिक नगरसेवकांनाही माहिती नसणे, यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश
बैठकीत उपस्थित व्यापारी आणि नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की, स्थानिक नागरिकांचा विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेतल्यास तीव लोकआंदोलन उभारले जाईल. तसेच, १३ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, हा विषय नेमका कोणी, कोणत्या उद्देशाने आणि कोणाच्या सूचनेवरून अजेंड्यावर आणला, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






