Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं

कोकणात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाची थंडी अधिक तीव्र आहे. काही भागांत धुके आणि तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 06, 2026 | 02:55 PM
Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं

Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं

Follow Us
Close
Follow Us:
  • कोकणात थंडीचा जोर वाढला
  • थंडीचा कहर वाढला, तापमानात अचानक घसरण
चंद्रहास नगरकर

महाड साधारणतः उष्ण व दमट हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकण पट्टयात यंदा हिवाळ्याने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकणात सकाळी व रात्री गारठा, थंड वारे, काही भागांत धुके आणि तापमानात लक्षणीय घट जाणवत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाची थंडी अधिक तीव्र असल्याने नागरिकांमध्येही चर्चा सुरू आहे. हवामानशास्त्रीय दृष्टीने यामागे अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. भूगोल व पर्यावरण विषयाचे अभ्यासक तसेच सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पोलादपूर (जि. रायगड) येथील विभागप्रमुख प्रा. डॉ. समीर अरुण बुटाला यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

प्रभाग २६ मध्ये भाजपचा जयघोष; ‘काम करत आलोय, काम करत राहणार’ – ऐश्वर्या सम्राट थोरात यांचा विजयाचा निर्धार

ईशान्य ऑक्टोबरनंतर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव

सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर नैऋत्य मोसमी वा-यांची माधार सुरू होते. त्यानंतर उत्तर भारतात तापमान घटल्याने तेथे थंड हवेचा दाब वाढतो, हिमालयीन भागातून ही थंड व कोरडी हवा दक्षिणेकडे वाहू लागते. हेच ईशान्य मोसमी वारे महाराष्ट्र आणि कोकणात पोहोचल्यावर तापमान झपाट्याने खाली येते. ओलावा कमी आणि थंडपणा अधिक असल्याने रात्री व पहाटे गारवा प्रकर्षाने जाणवत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

दीर्घकाळ पडलेल्या पावसाचा परिणाम

यावर्षी मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाची सुरुवात झाली आणि ऑक्टोबरपर्यंत अनेक भागांत पावसाची सक्रियता राहिली. परिणामी जमिनीत मोठ्या प्रमाणावर ओलावा साठला. ढगाळ हवामानामुळे उष्णता साठली नाही. ओलसर जमीन रात्री लवकर थंड होत असल्याने थंडी अधिक जाणवू लागली आहे.

कोकणातही तीव्रतेने थंडीची ही आहेत कारणे

कोकणाचे हवामान साधारणतः उष्ण व दमट असते. मात्र यंदा सातत्याने वाहणारे थंड वारे, अनेक दिवस स्वच्छ आकाश असल्याने रात्रीची उष्णता थेट अवकाशात निघून जाणे, तसेच जंगलतोड, डोंगर उत्खनन यांसारख्या मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक उष्णता संतुलन बिघडणे, या कारणांमुळे कोकणातही थंडी तीव्रतेने जाणवत आहे.

प्रशांत महासागरातील एल-निनो, ला-निना प्रवाहांचा परिणाम

प्रशांत महासागरातील एल-निनों व ला निना या हवामान प्रवाहाचा भारताच्या हिवाळ्यावर परिणाम होतो. एल-निनोच्या काळात पावसाचे प्रमाण कमी होऊन उष्णता वाढते, तर ला-निना स्थितीत समुद्राचे पाणी थंड होत असल्याने वातावरणात गारवा वाढतो. यंदा ला-निनाचा पूर्ण प्रभाव नसला तरी अंशतः परिणाम जाणवत असून त्यामुळे उत्तरेकडील थंड चाऱ्यांना अधिक बळ मिळाले आहे.

Shivsena : “आम्ही फोटो आणि पीपीटी दाखवत नाही, काम करून दाखवतो…”, शायना एन.सी. यांचा उबाठावर हल्लाबोल

पुढील काळात ऋतूमध्ये काय बदल?

हवामान तज्ज्ञांच्या मते, ज्या वर्षी हिवाळा अधिक तीव्र असतो त्या वर्षी उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. जमिनीतील ओलाचा उन्हाळ्यात लवकर वाफ होतो आणि हवामानातील असमतोलामुळे उष्णतेच्या लाटा (हीट वेव्ह) निर्माण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे येणारा उन्हाळा अधिक उष्ण, कोरडा आणि त्रासदायक ठरू शकतो.

यंदाच थंडी जास्त का वाढली?

गेल्या काही वर्षांत जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, समुद्रातील प्रवाहांतील बदल, वायुप्रदूषण आणि जंगलतोड यांमुळे हवामान अधिक अस्थिर झाले आहे. यंदा थंड हवेचा प्रवाह अधिक काळ टिकून राहिला, पावसाचा कालावधी लांबला.

सध्या कोकणात जाणवणारी थंडी ही केवळ ऋतू बदलाचा परिणाम नसून जागतिक हवामान बदल, समुद्रातील प्रवाहातील चढ-उतार, पावसाच्या स्वरूपातील बदल, वाऱ्यांची दिशा आणि मानवी हस्तक्षेप यांचा एकत्रित परिणाम आहे. भविष्यात अशा टोकाच्या हवामान बदलांना अधिक वेळा सामोरे जावे लागेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.- प्रा. डॉ. समीर अरुण बुटाला, भूगोल व पर्यावरण अभ्यासक, महाड

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Temperature drop in konkan weather cold wave increased winter update raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • kokan
  • raigad
  • Winter News

संबंधित बातम्या

RATNAGIRI :दहावीचा कोकण बोर्डाचा निकाल ९७.६२ टक्‍के, टक्‍केवारीत मुलींचे वर्चस्व
1

RATNAGIRI :दहावीचा कोकण बोर्डाचा निकाल ९७.६२ टक्‍के, टक्‍केवारीत मुलींचे वर्चस्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.