
Raigad News: पेण तालुक्यातील पुलांची दयनीय अवस्था; ग्रामपंचायतींना सूचना फलक लावण्याचे आदेश
Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताक्रुझमध्ये पावसाची दमदार सुरुवात…
पेण तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या २४ पुलांची धोकादायक म्हणून नोंद करण्यात आली आहे. तर पेण पूर्व भागातील वरसई, जावळी आणि आष्टे या भागातील ३ पुलांची मात्र अतिधोकादायक म्हणून नोंद करण्यात आली असल्याने या पुलावरून अवजड वाहतूक करणे धोक्याचे ठरणार आहे. वरसई वाशिवली करंबेळी छत्तीशी ते कातकरी वाडी हा बाळगंगा नदीवरील पूल धोकादायक आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात जर का हा पूल कोसळला तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जावळी वरसई या बाळगंगा नदीवरील पूल देखील जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या ऑडिट नुसार धोकादायक ठरविण्यात आला असून या पुलाची लवकरात लवकर डागडुजी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पुलाच्या डागडुजीसाठी अंदाजे ३० लाख रुपये खर्च येणार असून कोयना पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत निधी मंजूर व्हावा, अशी विनंती केली आहे.
आष्टे छोटे मार्गावरील साकव देखील धोकादायक ठरविण्यात आला असून या सकवाला आणि जोड रस्त्याला रेलिंगचे काम करून घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. साधारणता ५ लाख रुपये खर्च आवश्यक आहे. याच पुलावर अनेक अपघात झाले. कोयना पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत निधी मंजूर व्हावा, अशी विनंती जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने अहवालात केली आहे.
‘गिरगावकरांना वीजपुरवठा समस्येबाबत दिलासा मिळेपर्यंत…’; Mangal Prbhat Lodha यांचा इशारा
या धोकादायक पुलांवर दुर्घटना होऊ नये किंवा जीवितहानी होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींना पुलाच्या सुरुवातीस सूचनावजा फलक लावण्यास सांगितले. मात्र या पुलांची डागडुजी किंवा नव्याने पुनर्बाधणी लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून मिळावी यासाठी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवला आहे. – समीर पाटील, उपअभियंता, पेण