Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताकृझमध्ये पावसाची दमदार सुरुवात...
NEET आणि CBSE परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा “युवा आक्रोश मोर्चा”
मुंबईकरांना मे महिन्याच्या अखेरपासूनच पावसाची प्रतिक्षा होती. त्यांची ही प्रतिक्षा अखेर आता संपली आहे. कारण आता मुंबईतील अंधेरी, बांद्रा, सांताक्रुझ, खार या भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
अंधेरी, बांद्रा, सांताक्रुझ, खार या भागांसह जोगेश्वरी आणि ठाण्यातील काही भागांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तर काही भागांमध्ये केवळ पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत तर काही भागांत केवळ वादळी वारे सुटले आहेत. एकूणच आता मुंबईतील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले होते. नागरिकांना आतुरतेने पावसाची प्रतिक्षा लागली होती. आता अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळत होत्या. पण जोरदार पाऊस कधी सुरु होणार आणि उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार याची मुंबईकरांना प्रतिक्षा होती. आता अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. मुंबई उपनगरांसह ठाणे आणि नवी मुंबईतील काही भागांमध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. सध्या अंधेरी, बांद्रा, सांताक्रुझ, खार, जोगेश्वरी, ठाणे, वसई, कल्याण आणि पनवेलमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे.
मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईतील पावसाचा वेग पाहता, सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. तसेच अचानक पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सकाळच्या वेळेस नागरिकांची कामावर जाण्याची घाई असते आणि अशातच मुसळधार पाऊस सुरु झाल्याने रस्त्यावरील वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला आहे.






