
Raigad News: पाऊस लांबल्याने भाज्या महागल्या! पनवेल कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांची आवक घटली
घाऊक बाजारात आठ ते दहा रुपयांच्या दरात विकल्या जाणाऱ्या फ्लॉवर व कोबी या भाज्या प्रत्यक्षात स्वयंपाकघरात येईपर्यंत ४० ते ४५ रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. तर भेंडी, फरसबी, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची या भाज्यांचेही दर ६० ते ८० रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे आधीच पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पनवेलच्या मार्केट यार्डमध्ये भाज्यांची आणि विशेषत: पालेभाज्यांची भरपूर आवक होती. त्यामुळे बाजारात भाज्यांची स्वस्ताई होती. परंतु उन्हाच्या झळांमध्ये अजून वाढ होऊ लागताच फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, भेंडी, वांगी अशा सर्वच भाज्यांचे घाऊक आणि किरकोळ दर दुपटीने वाढले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात तहान भागवणाऱ्या आणि शरीराला थंडावा देणाऱ्या फळांची मागणी झपाट्याने वाढू लागते. सध्या पनवेल फळबाजारात मागणी-पुरवठा समतोल बदलताना दिसत असून, काही फळांचे दर स्थिर तर काही ठिकाणी तेजीत आहेत.
तापमान वाढताच टरबूज, खरबूज, द्राक्षे, लिंबू, पपई आणि आंबा यांसारख्या फळांची मागणी सातत्याने वाढते, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढणाऱ्या फळांना अधिक पसंती मिळत आहे. व्हिटॅमिन-समृद्ध फळांमुळे शहरी भागातही खरेदी वाढ झाली आहे. जूस सेंटर, हॉटेल आणि किरकोळ विक्रीत वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, किरकोळ बाजारात गवार, फरसबी, वाटाणा आणि घेवड्यासारख्या भाज्यांनी तर किलोमागे शंभरी गाठली आहे. उन्हाळा आणि दुष्काळ यामुळे ही दरवाढ झाल्याची कारणे दिली जात आहेत. आगामी काळात भाज्या आणखी महाग होतील, अशी शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.
एसटी वाचविण्यासाठी जनआंदोलनाची गरज; नेतृत्त्व प्रताप सरनाईक यांनीच करावे : श्रीरंग बरगे
पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातून पनवेलला घाऊक पुरवठा होत असतो. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने भाजीपाल्याच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे साधारणपणे एप्रिल, मे महिन्यात भाज्यांचे दर वाढतात. यंदा मात्र मार्च महिन्याव्या सुरुवातीपासूनच दरवाढ झाल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. ऋतुचक्राचा फटका भाज्याच्या उत्पादनाला बसत आहे, अशी माहिती पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक व्यापारी राम पाटील यांनी दै. ‘नवराष्ट्र ‘ला दिली.