Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक पीर आकुसखा बाबांचा यात्रोत्सव उत्साहात!

हजरत पीर सिंकदर अली शहा ( र. अ ) पीरबाबा आकुसखा बाबा यांची दर्गा हे मुस्लिम धर्मियांची पवित्र स्थळ आहे. माघी पौर्णिमेला येथे भरणारा उर्स हिंदू -मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक मानला जातो उर्सविषय...

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 04, 2026 | 01:28 PM
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक पीर आकुसखा बाबांचा यात्रोत्सव उत्साहात!

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक पीर आकुसखा बाबांचा यात्रोत्सव उत्साहात!

Follow Us
Close
Follow Us:

निसर्गाने भरभरून नटलेले पोफळी गाव. पोफळी हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेले एक गाव आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या वीज निर्मिती केंद्रामुळे गावाला फार मोठी प्रसिद्धी लाभली आहे. गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत हजरत पीर सिंकदर अली शहा ( र. अ ) पीरबाबा आकुसखा बाबा यांची दर्गा हे मुस्लिम धर्मियांची पवित्र स्थळ असून माघी पौर्णिमेला येथे भरणारा उर्स हिंदू -मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक मानला जातो उर्सविषय जाणून घेऊया…

कोकणात 1500 ते 1600 दरम्यान कोळी लोकांच्या सात भावाचे राज्य होते त्यांच्यात भांडणे होती राजे असल्यामुळे ते लोकांना अन्यायाने वागवित होते. अशावेळी कोकणी लोकांचा एक गट विजापूरच्या अली आदिलशाहकडे गेला कोळी राजा हा अत्याचारी आहे. प्रजेला त्रास देतो तेंव्हा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी बादशाह यांनी लढाई करून आमची सुटका करावी अशी विनंती या गटाने आदिलशाहला केली. बादशाहाने हे मान्य केले आणि दरबार भरविला त्यात सर्व जाती धर्माचे शूर सेनापती होते. पीर आकुसखा बाबा हेही एक सेनापती आणि लोकजागृती करणारे संत होते. त्यांनी कोळी राजाशी लढाई करण्याचा शब्द बादशाहाला दिला बादशाहांने त्याला मान्यता दिल्यानंतर ते विजापूरहुन निघाले. कोकण हद्दीच्या घाटमाथ्यावर येऊन बाबांनी छावणीतळ ठोकला. कोळी राजा आणि विजापूरकर यांच्यात युद्ध सुरू झाले. विजापूरच्या सेन्याने कोळी राजाच्या सेन्याला हटवित पुढे आणले. आता ज्या ठिकाणी समाधी आहे, त्याठिकाणी येऊन बाबा लढता लढता शहीद झाले.

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम

बाबांबरोबर ते सात सेनापती पाठविले त्यात इस्माईल खान,अलुसखा खान,भाई खान,करीम खान, इब्राहिम खान,सत्तर खान,आणि इतर सेनापती दाभोळ खाडीपर्यत मुकाबला करीत होते. या सेन्यात शिंदे ,मोकाशी यांचाही समावेश होता या लढ्यात कोळी राजाचा पराभव झाला आणि विजापुरच्या आदिलशाह बादशाहचे राज्य सुरू झाले. बरेच दिवस गेल्यानंतर बादशाह यांच्या स्वप्नात पीरबाबा गेले, मी शहीद झालो आहे त्याठिकाणी माझ्या दिवाबत्तीकरिता सेवक पाठवावे असे त्यांनी सेवक सय्यद मुस्तफा यांना पाठविले त्यांना सात गावांचे इनाम दिले बादशाह यांनी कोकणात पाठविले ते तेथे मानाने राहिले दर्ग्याच्या देखभालीबरोबर त्यांनी लोकसेवा सुरू करून आपले स्थान निर्माण केले पोफळी येथील हजरत पीर आकुसखाबाबांच्या दर्शनाला येतात संपूर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेस येथे मोठा उर्स भरतो हा उर्स दोन दिवस आणि दोन रात्री चालतो.

हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतीक

आकुसखा बाबांच्या कृपेने हिंदू-मुस्लिम बांधव याठिकाणी एकत्र येऊन अनेक वर्षे हा उर्स साजरा करीत आहेत दोन्ही समाजाने एकत्र नांदावे ही यांमागची भावना आणि गेली अनेक वर्ष ती टिकून आहे तसेच कवालीचा कार्यक्रम होणार आहे तर भाविकांसाठी चिपळूण आगारातून गाड्या सोडण्यात येणार आहेत तरी सर्व भाविकांनी पीर बाबाच्या दर्शनाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनउरूस कमिटी पोफळी सय्यदवाडी आकूसखानगर दर्गा यांनी केले आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे १२ तासांनंतरही बंद, कोंडी प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचा नवा सल्ला

Web Title: A symbol of hindu muslim unity today is the urs of pir akusakha baba in pofali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Hindu
  • maharashtra
  • Muslim
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ
1

रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात
2

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

Devendra Fadnavis : पायाभूत सुविधांसाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करावे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश
3

Devendra Fadnavis : पायाभूत सुविधांसाठी आवश्यक भूसंपादन गतीने पूर्ण करावे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश

महिला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार
4

महिला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.