
हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक पीर आकुसखा बाबांचा यात्रोत्सव उत्साहात!
निसर्गाने भरभरून नटलेले पोफळी गाव. पोफळी हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेले एक गाव आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या वीज निर्मिती केंद्रामुळे गावाला फार मोठी प्रसिद्धी लाभली आहे. गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत हजरत पीर सिंकदर अली शहा ( र. अ ) पीरबाबा आकुसखा बाबा यांची दर्गा हे मुस्लिम धर्मियांची पवित्र स्थळ असून माघी पौर्णिमेला येथे भरणारा उर्स हिंदू -मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक मानला जातो उर्सविषय जाणून घेऊया…
कोकणात 1500 ते 1600 दरम्यान कोळी लोकांच्या सात भावाचे राज्य होते त्यांच्यात भांडणे होती राजे असल्यामुळे ते लोकांना अन्यायाने वागवित होते. अशावेळी कोकणी लोकांचा एक गट विजापूरच्या अली आदिलशाहकडे गेला कोळी राजा हा अत्याचारी आहे. प्रजेला त्रास देतो तेंव्हा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी बादशाह यांनी लढाई करून आमची सुटका करावी अशी विनंती या गटाने आदिलशाहला केली. बादशाहाने हे मान्य केले आणि दरबार भरविला त्यात सर्व जाती धर्माचे शूर सेनापती होते. पीर आकुसखा बाबा हेही एक सेनापती आणि लोकजागृती करणारे संत होते. त्यांनी कोळी राजाशी लढाई करण्याचा शब्द बादशाहाला दिला बादशाहांने त्याला मान्यता दिल्यानंतर ते विजापूरहुन निघाले. कोकण हद्दीच्या घाटमाथ्यावर येऊन बाबांनी छावणीतळ ठोकला. कोळी राजा आणि विजापूरकर यांच्यात युद्ध सुरू झाले. विजापूरच्या सेन्याने कोळी राजाच्या सेन्याला हटवित पुढे आणले. आता ज्या ठिकाणी समाधी आहे, त्याठिकाणी येऊन बाबा लढता लढता शहीद झाले.
बाबांबरोबर ते सात सेनापती पाठविले त्यात इस्माईल खान,अलुसखा खान,भाई खान,करीम खान, इब्राहिम खान,सत्तर खान,आणि इतर सेनापती दाभोळ खाडीपर्यत मुकाबला करीत होते. या सेन्यात शिंदे ,मोकाशी यांचाही समावेश होता या लढ्यात कोळी राजाचा पराभव झाला आणि विजापुरच्या आदिलशाह बादशाहचे राज्य सुरू झाले. बरेच दिवस गेल्यानंतर बादशाह यांच्या स्वप्नात पीरबाबा गेले, मी शहीद झालो आहे त्याठिकाणी माझ्या दिवाबत्तीकरिता सेवक पाठवावे असे त्यांनी सेवक सय्यद मुस्तफा यांना पाठविले त्यांना सात गावांचे इनाम दिले बादशाह यांनी कोकणात पाठविले ते तेथे मानाने राहिले दर्ग्याच्या देखभालीबरोबर त्यांनी लोकसेवा सुरू करून आपले स्थान निर्माण केले पोफळी येथील हजरत पीर आकुसखाबाबांच्या दर्शनाला येतात संपूर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेस येथे मोठा उर्स भरतो हा उर्स दोन दिवस आणि दोन रात्री चालतो.
आकुसखा बाबांच्या कृपेने हिंदू-मुस्लिम बांधव याठिकाणी एकत्र येऊन अनेक वर्षे हा उर्स साजरा करीत आहेत दोन्ही समाजाने एकत्र नांदावे ही यांमागची भावना आणि गेली अनेक वर्ष ती टिकून आहे तसेच कवालीचा कार्यक्रम होणार आहे तर भाविकांसाठी चिपळूण आगारातून गाड्या सोडण्यात येणार आहेत तरी सर्व भाविकांनी पीर बाबाच्या दर्शनाचा आणि कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनउरूस कमिटी पोफळी सय्यदवाडी आकूसखानगर दर्गा यांनी केले आहे.