
होळीनिमित चिपळुणातून एसटीच्या २७४ फेऱ्या
शिमगोत्सवासाठी १५ मार्चपर्यंत राहणार सेवा
स्वतंत्र वाहतूक नियंत्रकांची केली नेमणूक
चिपळूण: वैशिष्ट्यपूर्ण असलेला कोकणच्या शिमगोत्सवाला गावागावतून प्रारंभझाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्याठिकाणी असणारे बहुसंख्यने गावच्या दिशेने दाखल होवू लागले आहेत. यासाठी चिपळूण आगारातून जादा एसटी फेऱ्याचे नियोजन केले आहे. या फेऱ्यांना फेब्रुवारी अखेरीस प्रारंभ झाला असून १५ मार्चपर्यंत तब्बल २७४ फेऱ्या सोडण्यात येणार आहे. कोकणात प्रमुख सणापैकी एक असणाऱ्या शिमगोत्सवाची ख्याती सर्वदूर पसरली आहे.
होळी, पालखी सोहळा, जत्रा अशा माध्यमातून संस्कृतीचे घडवणाऱ्या शिमगोत्सवाची विविध दर्शन ओढ असते. ठिकठिकाणी प्रत्येक कोकणवासियाला तालुक्यात शिमगोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यामुळे कामानिमित्त बाहेर असणारे बहुतांशी भाविक गावच्यादिशेने दाखल झाले आहेत. यामुळे शिमगोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या व शिमगोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता चिपळूण आगाराने प्रतीवर्षांप्रमाणे यंदाही विशेष नियोजन केले आहे.
Shimga Festival: कोकणवासींयासाठी खुशखबर! शिमगोत्सवासाठी धावणार ‘ही’ स्पेशल मेमू Train
गावच्या दिशेने भाविक येऊ लागल्याने मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. चाकरमान्याच्या मागणीनुसार बसस्थानकातून सुटणाऱ्या व पुन्हा तेथून बसस्थानकात येणाऱ्या फेऱ्याचे आगार प्रशासनाने नियोजन केले आहे. या फेऱ्यांना २६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. १५ मार्च पर्यंत या फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. आहे. त्यानुसार एकूण २७४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे शिमगोत्सवात गावी येणाऱ्या जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुलभ झाला आहे.
मुंबई, चिंचवड, स्वारगेट, भांडुप, बोरिवली, भाईंदर या मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत. शिमगोत्सव कालावधीत एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगार प्रशासनाने विशेष भर दिला आहे. त्यासाठी योग्य नियोजन करून स्वतंत्र वाहतूक नियंत्रकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे.
कोकणकरांसाठी ‘लालपरी’ सज्ज; आरक्षण फुल्ल अन्…; MSRTC तब्बल ‘इतक्या’ गाड्या सोडणार
होळीकरिता जादा गाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकांतून गुहागर, खेड, विपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागात जादा एसटी धावणार आहेत. या गाड्या नियमित फे-याव्यतिरिक्त आहेत. मुंबईतील ७८ पैकी ३९ बसचे समुह आरक्षण झाले आहे. मुंबई महानगरातील कोकणवासी होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने वाहतुकीचे नियोजन केले आहे. एसटीची होळी जादा वाहतूक गुरुवारपासून सुरू झाली.