
कोकणात निर्माण झाला पाणीटंचाईचा प्रश्न
पाणीपुरवठा विभागाकडून कृती आराखडा तयार
उष्णतेमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी
खेड: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढलेल्या उष्णतेमुळे खेड तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून, विहिरी, बोअरवेल व अन्य जलस्रोतांचा पाणीसाठा (Kokan) झपाट्याने कमी होत चालला आहे. परिणामी अनेक ठिकाणी स्रोत आटण्याच्या मार्गावर असल्याने या वर्षी ही तालुक्यातील ३३ गावे ५० वाड्या टंचाई कृती आराखडयात नमूद करण्यात आली आहेत.
कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये बुथराईवाडी, भराडे, निमणी, घेरारसाळगड, धनगरवाडी, पेठ-तांबट बौद्धवाडी, खवटी (खालची व वरची वाडी), सवेणी धनगरवाडी, कुळवंडी- दंडवाडी, शिंदेवाडी, कळंबणी, तिसंगी, मांडवे, वाडीबेलदार, हुंबरी, तळे पालांडेवाडी, मोहाने-देऊळवाडी, जामगे, जैतापूर, कुंभाड-मानग्याचीवाडी, शिंगरी, पुरे बुद्रुक, घेरापालगड, किंजळे, केळणे, मांगलेवाडी, भोसलेवाडी, गुणदे काळकाईवाडी, चिरणी-धनगरवाडी, पोसरे, तांबडवाडी, सात्विनगाव, गवळवाडी, बोलेवाडी, शेल्डी, जानकरवाडी, मालपवाडी, तळघर, कासई-बोरवाडी, ताठरेवाडी, तिसंगी बिजघर, असगणी, कोकाटेवाडी, नांदिवली, हंबरी, जांभुळवाडी आदी गावांचा समावेश आहे.
या कृती आराखड्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम, गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव, तहसीलदार सुधीर सोनवणे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग खेडचे एस. व्ही. बुटाला यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लांजा तालुका होणार टंचाईमुक्त; ४ कोटी २५ लाख ८३ हजारांचा आराखडा मंजूर
पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद
मार्च महिना सुरू झाला असून होळी-धुळवड साजरी होत आहे, गुढीपाडवा उंबरठ्यावर येवून ठेपला असताना नायगाव शहरात पाण्याचा थेंबही नळातून पडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग चौथ्या दिवशी पाणीपुरवठा ठप्प झाला असून जिगळा तळ्यावर सील ठोकताच शहराचा मुख्य पाणीस्त्रोत बंद पडला आणि प्रशासनाच्या कारभाराचा फटका थेट जनतेला बसला.
नगरपंचायतीकडील सुमारे ३० लाख रुपयांच्या पाणीपट्टी थकबाकीमुळे ही कारवाई करण्यात आली. मात्र या निर्णयाचा परिणाम थेट नागरिकांवर झाला. सणासुदीच्या दिवसांत घरगुती कामे, धार्मिक विधी आणि पाहुणचारासाठी पाण्याची मोठी गरज असताना नागरिकांना विहिरी, बोअरवेल आणि खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. नायगाव नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली, नगरपंचायतीकडे ३० लाख रुपयांची थकबाकी आहे; मात्र शहरवासीयांकडूनच तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांची पाणीपट्टी बाकी आहे. कर वसुलीसाठी आम्ही सक्ती करत नाही.