
पडलेल्या गारपीटीचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना
तासगाव शहरात सुमारे दीड तास कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन काही काळ विस्कळीत झाले, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला. तालुक्यातील सावळज, मनेराजुरी, विसापूर, मांजर्डे, कवठेएकंद, पेड़ था परिसरातही काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र नागाव-निमणी परिसरात सर्वाधिक गारपीट झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपिटीचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी
या पावसामुळे उष्णतेत काहीसा गारवा निर्माण झाला असला, तरी गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. कृषी व महसूल विभागाने त्वरीत पाहणी करून मदतीची प्रक्रिया सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत असून तासगाव तालुक्यात सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गारपीटीच्या नव्या संकटाने बागायतदार शेतकरी आला अक्षरश: मेटाकुटीला
मका पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यापूर्वीच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर उत्पादनात घट, वाढलेले खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना आता गारपिटीच्या नव्या संकटाने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाली, तर जनजीवन काही काळ विस्कळीत झाले.